शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

डेंग्युसदृश आजाराने घाबरु नका

By admin | Updated: October 1, 2014 23:20 IST

जिल्ह्यातील काही भागात डेंग्युसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सरले आहे. मात्र नागरिकांनी डेंग्यूच्या आजाराने घाबरुन न जाता नजीकच्या रुग्णालयात

आशुतोष सलील यांचे आवाहन : राजुरा येथे कार्यशाळेत मार्गदर्शन चंद्रपूर : जिल्ह्यातील काही भागात डेंग्युसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सरले आहे. मात्र नागरिकांनी डेंग्यूच्या आजाराने घाबरुन न जाता नजीकच्या रुग्णालयात जाऊन योग्य तो उपचार करुन घ्यावा. स्वच्छता हाच डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक एकमेव उपाय आहे. डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले. राजुरा पंचायत समितीत मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. ज्या परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत, त्या परिसरात आरोग्य विभाग व चंद्रपूर जिल्हा परिषदेच्यावतीने जनजागृती कार्यशाळा घेण्यात येत आहे. त्यानुसार राजुरा येथेही कार्यशाळा पार पडली. तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचारी यांच्या सहभागात डेंग्यू जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकर, राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी ज्ञानश्वर सपाटे, जिल्हा हिवताप अधिकारी नन्नावरे उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. दीपक सेलोकर यांनी उपस्थिताना डेंग्यू आजाराबाबतची कारणे, लक्षणे व उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. डेंग्यू आजार कशामुळे होतो व त्याच्या प्रतिबंधासाठी काय उपाय करावे, याबाबत मार्गदर्शन केले. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून त्याचा प्रसार एडीस इजिप्टा डासाच्या मादीने चावा घेतल्याने होतो. या डासाची घनता शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळून आलेली आहे. एडीस डास घरात घराभोवतीच्या साठविलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो. मुख्यत्वेकरुन पाणी साठविलेली उघडी भांडी, रांजन, ड्रम, घराभोवती इतर पडलेल्या निरुपयोगी वस्तू, खराब टायर्स, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक बाटल्या, बाटल्यांची टोपणे, चहाचे डिस्पोजेबल कप, डबे, पाण्याची कारंजी, फुलदाण्या, कुंड्या, जुन्या पद्धतीचे कुलर्स, फ्रिज, घराच्या छतावर टाकलेले प्लास्टिक, पक्षांना पाणी पिण्यासाठी ठेवलेली भांडी इत्यादी वस्तुंची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी व स्वच्छता बाळगावी, असे याप्रसंगी सांगण्यात आले.डेंग्यू आजारात तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, तीव्र पोटदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर रॅश, पुरळ अशी लक्षणे आढळून येतात व गंभीर आजाराचे रुग्ण असल्यास प्लेटलेट कमी होऊन रक्तस्त्रावामुळे आणि शॉकमुळे त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे डेंग्यू आजाराचे पॉझेटीव्ह रुग्ण आढळून आल्यास, डेंग्यूवर कोणताही नेमका उपचार नसल्यामुळे ताप आल्यास योग्य उपचाराकरिता पॅरासिटामॉल द्यावे, भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे व लक्षणानुसार उपचार करणे हेच महत्वाचे प्रथम योग्य उपचार आहेत. त्यामुळे डेंग्यू आजाराने घाबरुन न जाता संबंधित रुग्णांनी नजिकच्या दवाखान्यात जाऊन योग्य उपचार घ्यावे, असा सल्ला कार्यशाळेत देण्यात आला.घराभोवती परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, जुने टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक कप, वेस्टेज प्लास्टिक जाळून टाकावे, पाण्याची भांडी, ड्रम, रांजन व्यवस्थित झाकून ठेवावीत, शौचालयाच्या हेंट पाईपला जाळी बसविण्यात यावी, गावात आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरातील डबकी वाहती करावी, शक्यतो बुजवावी. डासापासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसविण्यात याव्या व झोपताना मच्छरदानीचा वापर करावा, अशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)