शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:20 IST

शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी वेकोलिला दिल्या़ मात्र वेकोलिने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेतले नाही.

ठळक मुद्देवामनराव चटप : पोवनी येथे आंदोलन; तीन तास वाहतूक रोखली

आॅनलाईन लोकमतगोवरी : शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी वेकोलिला दिल्या़ मात्र वेकोलिने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेतले नाही. पोवनी २ व ३ या कोळसा खाणींचे भूमिपूजन एकाच वेळी केले. परंतु पोवनी ३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिने नोकरीत घेतले नाही. हा अन्याय असून स्वत:च्या जमिनी देऊनही नोकरी व योग्य मोबदला मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागत असेल तर हे सरकार गरिबांच्या कामाचे नाही़ हा अन्याय तातडीने बंद करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली़ पोवनी फाट्यावर शुक्रवारी रास्ता रोखो आंदोलनाप्रसंगी आयोजित सभेत केला़यावेळी अ‍ॅड़ चटप पुढे म्हणाले, की सरकार शेतकºयांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना दिसत नाही. शेतकºयांना केवळ अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून मोदी सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. शेतमालाला तोकडा दर असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतमालाना उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव द्यावा, सर्व शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज संपवून सरसकट कर्जमाफी करावी राजुरा- भोयगाव, नारंडा- पोवनी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. विरुर (गाडेगाव) कोलमाईन्समध्ये राहिलेल्या १७ टक्के शेतकºयांच्या जमिनी वेकोलिने घेऊन शेतकºयांना नोकरीत सामावून घ्यावे. यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात पोवनी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले़ केला. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राजुरा- कवठाळा मार्गावरील वाहतूक तीन तास रोखून धरली होती. आंदोलनामुळे वाहतूक प्रभावित झाली़ वेकोलितून कोळसा वाहतूक शेकडो ट्रक दोन्ही बाजूला उभा होत्या़आंदोलन स्थळी कोणतीही अनुचित घटना घऊ नये म्हणून ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात राजुरा पोलिसाचा ताफा दाखल झाला होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेखर देशमुख आंदोलनस्थळी दाखल झाले होते. मात्र, शेतकºयांनी सरकारविरोधी घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले़शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर दिवे, शेषराव बोंडे, बाजार समितीचे सभापती हरिदास बोरकुटे, शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख बाबा पाटील कावळे, दशरथ बोबडे, मारोतराव लोहे, दत्तुजी ढोके, गणेश काळे, बंडू जुनघरी, सुरज जिवतोडे, प्रमोद लांडे, सचिन निखाडे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले उपस्थित होते.५० आंदोलनकर्त्यांना अटक व सुटकाशेतकरी संघटनेने पोवनी फाट्यावर केलेल्या रास्तारोको आंदोलनात शेतकरी नेते व माजी आमदार अ‍ॅड. चटप यांच्यासह जवळपास ५० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली़ ठाण्यात हजर केल्यानंतर े काही वेळेत सुटका केली़