शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

दिव्यांग भाग्यरथाबाईच्या आयुष्यात अंधारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:08 AM

जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात.

ठळक मुद्देशासनाच्या योजना कागदावरच : दिव्यांगांचा निधी जातो कुठे ?जागतिक अपंग दिन विशेष

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. परंतु, करणार काय? जन्मताच पदरी आयुष्यात दिव्यांगाचे जगणे आले. मात्र जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ती मिळेल ते काम करून संसाराचा गाडा पुढे रेटत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथील भाग्यरथाबाई विठोबा निब्रड (४८) या दिव्यांग महिलेची ही मन हेलावणारी कहाणी आहे. जन्मताच भाग्यरथाबाईला अपंगत्व आले. कमरेपासून दोन्ही पाय जन्मताच लुळे पडल्याने तिला सामान्याप्रमाणे चालता येत नाही. हाताचा आधार घेवून तिला कसेबसे चालावे लागते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. परंतु, भाग्यरथाबाईला पायांनी चालता येत नसल्याने हातावर चालण्याशिवाय पर्याय नाही.घरची परिस्थिती बेताची आहे. झोपडीवजा घरात तिचा संसार सुरू आहे. तिला दोन मुले आहेत. परंतु त्यांनीही आपला वेगळा संसार थाटला. कुणाकडे मजुरीला जावे तर तिला शेतावर जावून कामही करता येत नाही. भाग्यरथाबाई दिव्यांग असल्याने तिला मजुरीसाठी कामावर बोलावणार तरी कोण? तिला सामान्याप्रमाणे काम करता येत नाही. त्यामुळे ती हतबल झाली. तिच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. परंतु, तिने धीर सोडला नाही. माणूस कसाही असला तरी त्याला पोटाची भूक भागविण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधून काढावाच लागतो.उपाशी पोट माणसाला जीवंतपणीच जाळत असते. म्हणून भाग्यरथाबाई गावात मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. शासनाकडून ६०० रुपये एवढी तोकडी मदत भाग्यरथाबाईला मिळते, एवढीच शासनाची मेहरबानी. दरवर्षी शासन दिव्यागांसाठी विविध योजना राबविते. परंतु, त्या योजना ेगरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, मात्र हे दुर्दैवच आहे. त्यामुळे भाग्यरथाबाईला शासनाकडून मिळत असलेल्या ६०० रुपयात संसाराचा गाडा चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.जन्मताच कायमचे अपंगत्व आले आणि भाग्यरथाबाईच्या आयुष्यात कायमचा अंधारच पसरला. समाजात अशा असंख्य भाग्यरथाबाई आहेत, ज्यांच्यापर्यंत शासनाच्या दिव्यांगासाठीच्या योजना अजूनही पोहचल्या नाही. दरवर्षी शासन विकलांगासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. परंतु, त्याचा फारसा लाभ अपंग दिव्यागांना होत नाही, हे दुर्दैव आहे.जागतिक अपंग दिनी शासन दिव्यागांचा गौरव करेलही. परंतु, विकलांगतेमुळे ज्यांचे आयुष्यच करपले त्यांचे काय? शासन दिव्यांगाच्या आयुष्यात प्रकाश पेरणार की त्यांना असेच वाºयावर सोडून देणार, हा प्रश्न आजही कित्येक वर्षापासून अनुत्तरीतच असून दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम..!