शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

दिव्यांग भाग्यरथाबाईच्या आयुष्यात अंधारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:10 IST

जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात.

ठळक मुद्देशासनाच्या योजना कागदावरच : दिव्यांगांचा निधी जातो कुठे ?जागतिक अपंग दिन विशेष

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. परंतु, करणार काय? जन्मताच पदरी आयुष्यात दिव्यांगाचे जगणे आले. मात्र जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ती मिळेल ते काम करून संसाराचा गाडा पुढे रेटत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथील भाग्यरथाबाई विठोबा निब्रड (४८) या दिव्यांग महिलेची ही मन हेलावणारी कहाणी आहे. जन्मताच भाग्यरथाबाईला अपंगत्व आले. कमरेपासून दोन्ही पाय जन्मताच लुळे पडल्याने तिला सामान्याप्रमाणे चालता येत नाही. हाताचा आधार घेवून तिला कसेबसे चालावे लागते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. परंतु, भाग्यरथाबाईला पायांनी चालता येत नसल्याने हातावर चालण्याशिवाय पर्याय नाही.घरची परिस्थिती बेताची आहे. झोपडीवजा घरात तिचा संसार सुरू आहे. तिला दोन मुले आहेत. परंतु त्यांनीही आपला वेगळा संसार थाटला. कुणाकडे मजुरीला जावे तर तिला शेतावर जावून कामही करता येत नाही. भाग्यरथाबाई दिव्यांग असल्याने तिला मजुरीसाठी कामावर बोलावणार तरी कोण? तिला सामान्याप्रमाणे काम करता येत नाही. त्यामुळे ती हतबल झाली. तिच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. परंतु, तिने धीर सोडला नाही. माणूस कसाही असला तरी त्याला पोटाची भूक भागविण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधून काढावाच लागतो.उपाशी पोट माणसाला जीवंतपणीच जाळत असते. म्हणून भाग्यरथाबाई गावात मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. शासनाकडून ६०० रुपये एवढी तोकडी मदत भाग्यरथाबाईला मिळते, एवढीच शासनाची मेहरबानी. दरवर्षी शासन दिव्यागांसाठी विविध योजना राबविते. परंतु, त्या योजना ेगरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, मात्र हे दुर्दैवच आहे. त्यामुळे भाग्यरथाबाईला शासनाकडून मिळत असलेल्या ६०० रुपयात संसाराचा गाडा चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.जन्मताच कायमचे अपंगत्व आले आणि भाग्यरथाबाईच्या आयुष्यात कायमचा अंधारच पसरला. समाजात अशा असंख्य भाग्यरथाबाई आहेत, ज्यांच्यापर्यंत शासनाच्या दिव्यांगासाठीच्या योजना अजूनही पोहचल्या नाही. दरवर्षी शासन विकलांगासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. परंतु, त्याचा फारसा लाभ अपंग दिव्यागांना होत नाही, हे दुर्दैव आहे.जागतिक अपंग दिनी शासन दिव्यागांचा गौरव करेलही. परंतु, विकलांगतेमुळे ज्यांचे आयुष्यच करपले त्यांचे काय? शासन दिव्यांगाच्या आयुष्यात प्रकाश पेरणार की त्यांना असेच वाºयावर सोडून देणार, हा प्रश्न आजही कित्येक वर्षापासून अनुत्तरीतच असून दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम..!