शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

दिव्यांग भाग्यरथाबाईच्या आयुष्यात अंधारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:10 IST

जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात.

ठळक मुद्देशासनाच्या योजना कागदावरच : दिव्यांगांचा निधी जातो कुठे ?जागतिक अपंग दिन विशेष

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. परंतु, करणार काय? जन्मताच पदरी आयुष्यात दिव्यांगाचे जगणे आले. मात्र जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ती मिळेल ते काम करून संसाराचा गाडा पुढे रेटत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथील भाग्यरथाबाई विठोबा निब्रड (४८) या दिव्यांग महिलेची ही मन हेलावणारी कहाणी आहे. जन्मताच भाग्यरथाबाईला अपंगत्व आले. कमरेपासून दोन्ही पाय जन्मताच लुळे पडल्याने तिला सामान्याप्रमाणे चालता येत नाही. हाताचा आधार घेवून तिला कसेबसे चालावे लागते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. परंतु, भाग्यरथाबाईला पायांनी चालता येत नसल्याने हातावर चालण्याशिवाय पर्याय नाही.घरची परिस्थिती बेताची आहे. झोपडीवजा घरात तिचा संसार सुरू आहे. तिला दोन मुले आहेत. परंतु त्यांनीही आपला वेगळा संसार थाटला. कुणाकडे मजुरीला जावे तर तिला शेतावर जावून कामही करता येत नाही. भाग्यरथाबाई दिव्यांग असल्याने तिला मजुरीसाठी कामावर बोलावणार तरी कोण? तिला सामान्याप्रमाणे काम करता येत नाही. त्यामुळे ती हतबल झाली. तिच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. परंतु, तिने धीर सोडला नाही. माणूस कसाही असला तरी त्याला पोटाची भूक भागविण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधून काढावाच लागतो.उपाशी पोट माणसाला जीवंतपणीच जाळत असते. म्हणून भाग्यरथाबाई गावात मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. शासनाकडून ६०० रुपये एवढी तोकडी मदत भाग्यरथाबाईला मिळते, एवढीच शासनाची मेहरबानी. दरवर्षी शासन दिव्यागांसाठी विविध योजना राबविते. परंतु, त्या योजना ेगरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, मात्र हे दुर्दैवच आहे. त्यामुळे भाग्यरथाबाईला शासनाकडून मिळत असलेल्या ६०० रुपयात संसाराचा गाडा चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.जन्मताच कायमचे अपंगत्व आले आणि भाग्यरथाबाईच्या आयुष्यात कायमचा अंधारच पसरला. समाजात अशा असंख्य भाग्यरथाबाई आहेत, ज्यांच्यापर्यंत शासनाच्या दिव्यांगासाठीच्या योजना अजूनही पोहचल्या नाही. दरवर्षी शासन विकलांगासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. परंतु, त्याचा फारसा लाभ अपंग दिव्यागांना होत नाही, हे दुर्दैव आहे.जागतिक अपंग दिनी शासन दिव्यागांचा गौरव करेलही. परंतु, विकलांगतेमुळे ज्यांचे आयुष्यच करपले त्यांचे काय? शासन दिव्यांगाच्या आयुष्यात प्रकाश पेरणार की त्यांना असेच वाºयावर सोडून देणार, हा प्रश्न आजही कित्येक वर्षापासून अनुत्तरीतच असून दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम..!