शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

परंपरागत शेतीला फाटा देत संदीपची मत्स्य व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

राजू गेडाम मूल : धानाचे पीक घेण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केल्यानंतरही लावलेला पैसा व मिळालेले उत्पन्न यांची ...

राजू गेडाम

मूल :

धानाचे पीक घेण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केल्यानंतरही लावलेला पैसा व मिळालेले उत्पन्न यांची गोळाबेरीज केल्यानंतर वर्षभरातील मेहनत वाया जात असल्याचे निदर्शनास येताच परंपरागत शेतीला फाटा देत मत्स्य व्यवसायात उंच भरारी घेत या व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न घेत आहे.

मूल तालुक्यातील हळदी गावगन्ना येथील संदीप नंदाजी भुरसे असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. लहानशा खेड्यामध्ये मत्स्य व्यवसायात उत्तुंग भरारी घेतल्याने त्याच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होताना दिसत आहे.

जिद्द, चिकाटी व परिश्रम या बळावर अशक्य ते शक्य करून दाखविता येते, हेच मूल तालुक्यातील हळदी गावगन्ना या छोट्याशा गावातील युवक संदीप भुरसे यांनी कृतीतून दाखविले आहे.

परंपरागत शेतीत या तरुणाचे मन रमत नसल्याने त्याने परंपरागत शेतीला बगल देत शेतीत काहीतरी नावीन्यपूर्ण करावे व लाखोंचे उत्पन्न मिळावे या उद्देशाने मनात जिद्द, चिकाटी निर्माण केली. या बळावर त्याने परिश्रम घेऊन मत्स्य व्यवसाय करण्याचे ठरविले. शासनाचे कुठलेही अर्थसाहाय्य न घेता स्वतःचे भांडवल उभे करून आपल्या शेतात दीड एकरमध्ये दोन मत्स्य तलाव निर्माण केले. मत्स्य व्यवसायात त्याने रोहू, कटला, ग्लास, शिपनर, नीलगर या पाच प्रजाती वापरल्या. यावर त्याने दोन लाख रुपये खर्च करून या व्यवसायामधून तो आज वार्षिक सहा लाख रुपये कमवीत आहे. यावरच या तरुणाचे समाधान न झाल्याने त्यांनी मत्स्य तलावाच्या कडेच्या बांधावर बागायती शेती करण्याचा उपक्रम राबविला. या बांधावर त्यांनी वांगे, वाल, तूर, भेंडी व इतर पिके घेत असून यापासूनही तो हजारो रुपये कमवीत आहे.

बॉक्स

कुठलेही प्रशिक्षण नाही

मत्स्य व्यवसायासाठी संदीपने कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही. जशा समस्या आल्या, त्या पाहून व्यवसायात सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. यातून कुटुंबाचा आर्थिक प्रश्न मिटला असून अनेक नावीन्यपूर्ण योजना शेतात राबविण्याचा त्याचा मानस आहे. शेतात मत्स्य व्यवसाय करीत असताना कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार घेत त्यांनाही या कामात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मत्स्य व्यवसायात पैशाची लागत कमी असल्याने व अधिक नफा मिळत असल्याने परंपरागत शेतीसोबत मत्स्य व्यवसाय करावा, असा त्याचा तरुण शेतकऱ्यांना संदेश देत आहे.

बॉक्स

शासकीय योजना व प्रोत्साहनाची गरज

शेतकरी व होतकरू तरुण मंडळींना मत्स्य व्यवसायात शासकीय मदत मिळत नसल्याने संदीपने खंत व्यक्त केली आहे. शासनाने मत्स्य व्यवसायातील योजना गोरगरीब होतकरू तरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या क्षेत्रात भविष्यात परंपरागत शेतीसोबत चित्र बदललेले दिसेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.