शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा, काही ठिकाणी गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात राजुरा-गोवरी मार्गावरील मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीतील काटाघरासमोरील शेड कोसळल्याने येथे वेकोलिच्या काटाघरात कार्यरत असलेल्या आशिष बोभाटे या कर्मचाऱ्याची दुचाकी शेड कोसळल्याने मोडतोड झाली.

ठळक मुद्देवृक्ष, वीज खांब कोसळले : कोरोनाच्या संकटकाळात अवकाळीचे विघ्न, शेतमालाचेही मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सूर्याचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवारी मध्यरात्री चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले. मेघगर्जनेसह हा पाऊस सुमारे पाऊणतास झोडपला. त्यानंतर पुन्हा रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पाऊस बरसला. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले. घरावरी टिना उडाल्या. विजेचे खांब कोसळले. परिणाम चंद्रपूरसह अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला.राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात राजुरा-गोवरी मार्गावरील मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीतील काटाघरासमोरील शेड कोसळल्याने येथे वेकोलिच्या काटाघरात कार्यरत असलेल्या आशिष बोभाटे या कर्मचाऱ्याची दुचाकी शेड कोसळल्याने मोडतोड झाली. राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, रामपूर, माथरा, पोवनी, साखरी, चिंचोली, वरोडा परिसरासह राजुरा तालुक्यातील बहुतांश गावात आलेल्या अवकाळी पावसासह वादळाने मोठे नुकसान झाले आहे.गोवरी येथील सुनील देवाळकर यांच्या शेतातील गोठयावरील टिना उडून गेल्या.तर गोवरी येथे विद्युत जनित्रावर मोठे झाड कोसळल्याने गोवरी परिसरातील वीज पुरवठा १२ तासानंतरही खंडित होता. काही शेतकऱ्यांनी कापूस पिकांसह शेतमाल अंगणात ठेवला होता. मात्र अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा शेतमाल पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.भद्रावती तालुक्यात गारपीटभद्रावती : भद्रावती तालुक्यात वादळी वाºयासह पाऊस बरसला. अनेक ठिकाणी गारपिटही झाली. यामुळे शेतकºयांसह अनेक घरांचे तसेच शासकीय मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील चिरादेवी येथे पावर ग्रिड येथून परडी येथे जाणारे तीन टावर खाली पडल्याने पारेशन कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या शेतमालाचेही नुकसान झाले असून गावासह शहरातसुद्धा घरांची छते तसेच जनावरांचे गोठे जमीनदोस्त झाले. वेकोलि एकता नगर परिसरात तबल आठ झाडे उन्मळून पडली. काही भागाचे विद्युत खांब पडल्याने वाहतुकीचे रस्ते बंद झाले.आंबा पिकांना मोठा फटकापळसगाव : पळसगाव परिसारातील पळसगाव, कळमना, आमडी इतर भागात काही शेतकºयांनी आपल्या बांधावर आंब्याच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना केली. बहर जाऊन आंबे लागायला सुरुवात झाली. परंतु शनिवारी पहाटे पडलेल्या वादळी पावसामुळै आंबे पूर्णत: परिपक्व होण्याच्या आधीच खाली पडले. यात संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, पळसगाव परिसरात आमडी गावात अनेक शेतकऱ्यांनी हिरवी मिरचीबरोबरच लाल मिरचीचे उत्पादन घेतले. लॉकडाउनमुळे मिरची घरातच पडून आहे. बाहेर ठेवलेली मिरची पावसामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बल्लारपुरातील वीज पुरवठा खंडितबल्लारपूर : शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास बल्लारपुरात वादळासह मुसळदार पावसाने हजेरी लावली. वादळ व पाऊस सुमारे ५ वाजेपर्यंत सुरू होता. दरम्यान त्या काळात वीज पुरवठाही बंद होता. यात रस्त्यावरील अनेक झाडे पडली. अचानक आलेल्या या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊस