शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबकल्याण कार्यक्रमात जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:25 IST

कुटुंब कल्याण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या कल्याणकारी कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सोमवारी जि. प. परिषदेतील मा. सा. कन्नमवार सभागृहात प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅनिमिया मुक्त भारत मोहिमेचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

ठळक मुद्दे४७ आरोग्यसेवक पुरस्काराचे मानकरी : अ‍ॅनिमियामुक्त भारत मोहिमेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुटुंब कल्याण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या कल्याणकारी कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सोमवारी जि. प. परिषदेतील मा. सा. कन्नमवार सभागृहात प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅनिमिया मुक्त भारत मोहिमेचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.मंचावर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. एस. एस. मोरे, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी उदय मेघे, जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती क्रिष्णा सहारे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जीवतोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बिसेन, आरोग्य समितीचे सदस्य मानिक घोडमारे, रेखा कारेकार, शितल बांबोडे, मनिषा चिमूरकर, विद्या किन्नाके, वैशाली शेरकी, निलेश देवतळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.जि. प. अध्यक्ष भोंगळे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेतल्याने मानवाचे जीवन सुरक्षित झाले. पण लोकसंख्या नियंत्रणात आणू शकलो नाही. यापुढे प्रभावी पावले उचलू शकलो नाही तर साधन संपत्ती, सेवा अपुरी पडणार आहे. देशातील पिढी सुखी, समृध्द तसेच सुरक्षित ठेवण्याकरीता लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी रूग्णांना चांगली वागणूक आरोग्य सेवा द्यावी, असेही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी कर्मचाºयांनी केवळ वेतनाचा विचार न करता लोकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता नमुद केली. डॉ. राजकुमार गहलोत यांनी प्रास्ताविकेतून आरोग्य योजनांची माहिती दिली. संचालन अरूणा गतफने यांनी केले. डॉ. गजानन राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सुभाष सोरते, छाया पाटील, एस. पी. दुपारे, अशोक तुरारे व जि. प. आरोग्य विभागातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.मूल उपजिल्हा रूग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कारराज्यातील माता मृत्यू व बाल मृत्युचे प्रमाण कमी करणे आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव, मांडवा, चिचपल्ली तसेच गंगासागर हेटी, आवळगाव, मोहर्ली येथील आरोग्य उपकेंद्रेही पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.