शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

जि. प. मुख्याध्यापक समायोजनमध्ये अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:07 IST

जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे पद कमी झाल्यामुळे पदावनत करण्यात आले. मात्र त्यांना पूर्वपदावर रूजू करून न घेता पुन्हा पदावनतीनुसार खालचे पद देण्यात आले. त्यामुळे पदावनत मुख्याध्यापकांवर अन्याय झाला आहे. अन्यायग्रस्त मुख्याध्यापकांच्या समस्यांची दखल घेऊन न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देशिक्षक संघटनांचा आरोप : मुख्याध्यापकांना दोन पदावर केले पदावनत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे पद कमी झाल्यामुळे पदावनत करण्यात आले. मात्र त्यांना पूर्वपदावर रूजू करून न घेता पुन्हा पदावनतीनुसार खालचे पद देण्यात आले. त्यामुळे पदावनत मुख्याध्यापकांवर अन्याय झाला आहे. अन्यायग्रस्त मुख्याध्यापकांच्या समस्यांची दखल घेऊन न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यातील पात्र व अपात्र उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे समायोजन ११ जानेवारीला शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आले. यात एकूण मंजूर पदांवर मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यात पात्र शाळा व पात्र मुख्याध्यापक तसेच नव्याने पात्र मुख्याध्यापकांनाही त्याच शाळेवर ठेवण्यात आले. परंतु, उर्वरीत मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यामुळे त्यांना पदावनत करत पूर्वपदावर आणण्यात आले. यात जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या जागा रिक्त असेपर्यंत सामावलेल्या मुख्याध्यापकानंतरच्या मुख्याध्यापकांना जागा रिक्त नाही, असे कारण दाखविण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांना थेट सहाय्यक शिक्षक करण्यात आले. हा त्यांच्यावर अन्याय आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. पूर्वपात्रता लक्षात घेण्यात आली नाही. यादी प्रकाशित न करता समायोजन केल्यामुळे अशा मुख्याध्यापकांवर अन्याय झाला आहे. सदर अन्याय दूर करण्याची मागणी संघटनेचे विजय भोगेकर व राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या नेतृत्वात संघटनेच्या वतीने करण्यात आली. समायोजनानंतर विषय शिक्षक पदस्थापना घेण्यात आल्या. त्यात सहाय्यक शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त झाल्या. त्या जि.प. मधील मुख्याध्यापकांना मिळणे, हा त्यांचा हक्क होता. मात्र प्रशासनाने चुकीचे वेळापत्रक तयार करून शासन निर्णयाला धाब्यावर बसविले. कोणत्याही समायोजनापूर्वी पदस्थापना व पदोन्नती घ्याव्या, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे झालेला अन्याय दूर करावा अन्यथा अन्यायग्रस्त मुख्याध्यापकांना वरिष्ठांकडे दाद मागेल, अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लोखंडे देण्यात आले.यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष निखील तांबोळी, लोमेश येलमुले, मोरेश्वर बोंडे, सुधाकर कन्नाके, गणपत विधाते, मनोज बेले, राजू चौधरी, राजू दरवे, विजय हरमवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.शासन निर्णयाला बगलशासकीय सेवेत असणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा अधिकवेळा पदावनत करता येत नाही. त्यांना अन्य समकक्ष पदावर तात्पुरत्या स्वरुपात समयोजित करावे व जागा रिक्त झाल्यावर मूळ पदावर आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आले. परंतु नियमांचे पालन झाले नाही. काही मुख्याध्यापक हे पूर्वी सहाय्यक शिक्षक होते. त्यांना पूर्ववत सहाय्यक या पदावर आणायला हवे होते. शासन निर्णयाला बगल दिल्याने अन्याय झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.