शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचा एनपीए शून्य टक्के, निव्वळ नफ्यातही घसघशीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

सन २०१९-२० मध्ये बँकेचा सकल एनपीए २७.५६ टक्के होता; २०२०-२१ मध्ये तो १३७१ टक्के झाला. मार्च २०२२ मध्ये तो ७.८९ टक्क्यांवर आला. मागील १० वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी निव्वळ एनपीए ५.७५ टक्के होता. तो आता मार्च २०२२ अखेर शून्यावर आला आहे. यासोबतच ३१ मार्च २०२० अखेर बँकेचा ढोबळ नफा ४४.४४ लाख असताना निव्वळ नफा फक्त ०.४१ टक्के होता. मार्च २०२१ अखेर ढोबळ नफा ६०.३५ कोटी होता; तर निव्वळ नफा ३.३९ टक्के होता.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए इतिहासात पहिल्यांदाच शून्यावर आला आहे. १० वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी एनपीए ५.७५ टक्क्यांवर आला होता. बँकेच्या नफ्यातही ७५.८९ कोटींपर्यंत वाढ झालेली आहे. यामध्ये निव्वळ नफा ३.३९ कोटींहून तब्बल १६.५६ कोटींवर पोहोचला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिली. बँकेचा एनपीए शून्य टक्के आल्यामुळे बँकेच्या भागधारकांना बँक पहिल्यांदाच लाभांश देण्याची कार्यवाही करीत असल्याचेही रावत म्हणाले. बँकेला स्पर्धेच्या युगात टिकण्याकरिता डिजिटल बँकिंग व्यवसाय करण्याच्या उद्देशाने नेट बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही रावत यांनी सांगितले. सन २०१९-२० मध्ये बँकेचा सकल एनपीए २७.५६ टक्के होता; २०२०-२१ मध्ये तो १३७१ टक्के झाला. मार्च २०२२ मध्ये तो ७.८९ टक्क्यांवर आला. मागील १० वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी निव्वळ एनपीए ५.७५ टक्के होता. तो आता मार्च २०२२ अखेर शून्यावर आला आहे. यासोबतच ३१ मार्च २०२० अखेर बँकेचा ढोबळ नफा ४४.४४ लाख असताना निव्वळ नफा फक्त ०.४१ टक्के होता. मार्च २०२१ अखेर ढोबळ नफा ६०.३५ कोटी होता; तर निव्वळ नफा ३.३९ टक्के होता. ३१ मार्च २०२२ मध्ये बँकेच्या नफ्याचे उद्दिष्ट ७२ कोटींचे ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ७५.८९ कोटींचा ढोबळ नफा झाला तर निव्वळ नफा १६.५६ कोटींवर गेला आहे. मागील वर्षी बँकेची ऑपरेट काॅस्ट ९१.१७ कोटी होती. मार्च २०२२ अखेर ती ८५.६४ कोटी असून ६.५३ कोटींनी ती कमी झाली आहे. बँकेचे नक्त मूल्य शून्यापेक्षा कमी असायला नको. चालून वर्षात नक्त मूल्य २२३.६४ कोटी आहे. बँकेच्या भाग भांडवलात ८.९७ कोटींनी वाढ झालेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतही ३९.२५ कोटींनी वाढ झालेली आहे. पीक कर्जवाटपाची पूर्तता ११० टक्के केली आहे. तसेच दुर्धर आजाराकरिता ३१४ शेतकऱ्यांना ६४.७२ लाखांचा मदत निधी वाटप करण्यात आला आहे, असेही जिल्हा बँक अध्यक्ष रावत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक रवींद्र शिंदे, शेखर धोटे, संदीप गड्डमवार, विजय देवतळे, संजय तोटावार, ललित मोटघरे, उल्हास करपे, प्रकाश बन्सोड, पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर उपस्थित होते.

 

टॅग्स :bankबँक