शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

जिल्हा बँकेतील नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: November 17, 2016 01:47 IST

केंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे.

कुठे बदलणार नोटा? : राष्ट्रीयकृत बँकांचा अभाव, ग्रामीण नागरिकांचा ३० किमीचा प्रवासआशिष देरकर  कोरपनाकेंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण नागरिकांची दमछाक होत असून राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेच्या अभावामुळे नोटा बदलायचे कुठे, असा गंभीर प्रश्न ग्रामीण नागरिकांना पडला आहे.मोठ्या शहरांमध्ये राष्ट्रीयकृत बँका असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा जिल्हाभर पसरलेल्या आहेत. सहकारी बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप होत असल्याने सामान्य शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ओळखले जाते. बहुतांश ग्रामीण नागरिकांचे खाते जिल्हा बँकांमध्ये आहे. मात्र जवळील जुन्या नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्वीकारत नसल्याने ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यात केवळ ४ ते ५ राष्ट्रीयकृत बँका आहे. मात्र ५० टक्के लोकांचे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते नसून या बँकांमध्ये अनेक लोकांनी अजुनपर्यंत पाय ठेवलेला नाही. सुशिक्षीत लोकांना नोटा बदलविणे शक्य होत असले तरी म्हातारे, निरक्षर यांना नोटा बदलविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीयकृत बँका म्हणजे काय, असा प्रश्न अनेक नागरिक करीत आहे.अनेक खेड्यातील लोकांना राष्ट्रीयकृत बँकेत जाण्याच्या सक्तीमुळे नोटा बदलविण्यासाठी ३०-३५ किलोमिटरचा प्रवास करावा लागत आहे. ५०० रुपयांची नोट बदलविण्यासाठी १०० रुपये खर्च होत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. अशातही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्याला बँकेतील गर्दी पाहून झोप उडत आहे. कारण खेड्यापाड्यातील सहकारी बँकांचे खातेदार राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोटा बदलविण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.धान कापणी, बांधणीची कामे उधारीवरभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात धान उत्पादकांकडून धान कापणी, बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र मोदी सरकारने काळ्या पैशाविरोधात बंड पुकारत १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या निर्णयाला आठवडा होत असला तरी आवश्यकतेनुसार नोटा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापणी, बांधणीचे कामे उधारीवर करावी लागत आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांचे हाल होत आहे. यावर्षी धान कापणीची मजुरी परवडत नसल्याने स्थानिक मजूर वर्ग कापूस वेचणीच्या कामासाठी बाहेरगावी स्थलांतरीत झाल्याने कापणी व बांधणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होता. मात्र धानपिकांवर यावर्षी रोगाचे प्रमाण वाढल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला. महागड्या औषधांची फवारणी करूनही काहींना रोगावर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. नवीन धानाचे भाव अद्यापही निश्चित झालेले नाही. तरी धानाला अडीच हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)पूर्ण दिवस जातो बँकेतनोटा जरी बदलल्या असल्या तरी अजुनही जुन्याच नोटांवर अनेकांचे व्यवहार सुरू आहे. अनेकांनी जुन्या नोटा वापरून जुने देणी परत करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दररोजच व्यवहार होत असल्याने एक दिवसाआड बँकेत नोटा बदलीसाठी जावे लागत आहे. यामुळे सारा दिवस बँकेत रांगेत लागण्यात जात आहे.आधारबाबत जनजागृती नाहीदुर्गम भागातील नागरिक अजुनही फक्त बँक पासबुक किंवा जुन्या नोटा घेऊन बँकेत पोहचत आहेत. आधारकार्डबाबत जनजागृती नसल्याने आधारकार्ड न आणताच बँकेत येत आहे. त्यामुळे अशांना आल्यापावली परत जाऊन दुसऱ्या दिवशी आधारकार्ड घेऊन बँकेत यावे लागत आहे. त्यानंतरही बँकेच्या काऊंटरवर गेल्यास झेरॉक्स द्यावी लागत असल्याने रांगेत लागलेला नंबर मागे पडतो. पाचशे द्या, चारशे घ्या३०-३५ किमी अंतरावर जाऊन नोटा बदलविण्यासाठी बँकेत रांगेत लागून राहणे खर्चीक व वेळखाऊ ठरत असल्याने अनेकजण पाचशे रुपये घेऊन चारशे रुपये परत करीत आहेत. त्यामुळे मेहनतीचे पैसे वाया जात असल्याचे नागरिक सांगतात. सहकारी बँका म्हणतात, आरटीजीएस कराग्रामीण भागातील जनतेला आरटीजीएस काय आहे अजून माहित नाही. जिल्हा सहकारी बँकांना पैसा न पोहोचल्याने ते ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याची स्थिती आहे. अशातच तुमच्या खात्यातील रक्कम आरटीजीएस करून राष्ट्रीयकृत बँकेतून रक्कम उचला, असा सल्ला देण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकेचे खातेदार नसल्याने आरटीजीएसच्या सुविधेला अनेकांना मुकावे लागत आहे.