शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जिल्हा बँकेतील नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: November 17, 2016 01:47 IST

केंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे.

कुठे बदलणार नोटा? : राष्ट्रीयकृत बँकांचा अभाव, ग्रामीण नागरिकांचा ३० किमीचा प्रवासआशिष देरकर  कोरपनाकेंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण नागरिकांची दमछाक होत असून राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेच्या अभावामुळे नोटा बदलायचे कुठे, असा गंभीर प्रश्न ग्रामीण नागरिकांना पडला आहे.मोठ्या शहरांमध्ये राष्ट्रीयकृत बँका असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा जिल्हाभर पसरलेल्या आहेत. सहकारी बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप होत असल्याने सामान्य शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ओळखले जाते. बहुतांश ग्रामीण नागरिकांचे खाते जिल्हा बँकांमध्ये आहे. मात्र जवळील जुन्या नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्वीकारत नसल्याने ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यात केवळ ४ ते ५ राष्ट्रीयकृत बँका आहे. मात्र ५० टक्के लोकांचे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते नसून या बँकांमध्ये अनेक लोकांनी अजुनपर्यंत पाय ठेवलेला नाही. सुशिक्षीत लोकांना नोटा बदलविणे शक्य होत असले तरी म्हातारे, निरक्षर यांना नोटा बदलविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीयकृत बँका म्हणजे काय, असा प्रश्न अनेक नागरिक करीत आहे.अनेक खेड्यातील लोकांना राष्ट्रीयकृत बँकेत जाण्याच्या सक्तीमुळे नोटा बदलविण्यासाठी ३०-३५ किलोमिटरचा प्रवास करावा लागत आहे. ५०० रुपयांची नोट बदलविण्यासाठी १०० रुपये खर्च होत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. अशातही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्याला बँकेतील गर्दी पाहून झोप उडत आहे. कारण खेड्यापाड्यातील सहकारी बँकांचे खातेदार राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोटा बदलविण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.धान कापणी, बांधणीची कामे उधारीवरभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात धान उत्पादकांकडून धान कापणी, बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र मोदी सरकारने काळ्या पैशाविरोधात बंड पुकारत १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या निर्णयाला आठवडा होत असला तरी आवश्यकतेनुसार नोटा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापणी, बांधणीचे कामे उधारीवर करावी लागत आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांचे हाल होत आहे. यावर्षी धान कापणीची मजुरी परवडत नसल्याने स्थानिक मजूर वर्ग कापूस वेचणीच्या कामासाठी बाहेरगावी स्थलांतरीत झाल्याने कापणी व बांधणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होता. मात्र धानपिकांवर यावर्षी रोगाचे प्रमाण वाढल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला. महागड्या औषधांची फवारणी करूनही काहींना रोगावर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. नवीन धानाचे भाव अद्यापही निश्चित झालेले नाही. तरी धानाला अडीच हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)पूर्ण दिवस जातो बँकेतनोटा जरी बदलल्या असल्या तरी अजुनही जुन्याच नोटांवर अनेकांचे व्यवहार सुरू आहे. अनेकांनी जुन्या नोटा वापरून जुने देणी परत करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दररोजच व्यवहार होत असल्याने एक दिवसाआड बँकेत नोटा बदलीसाठी जावे लागत आहे. यामुळे सारा दिवस बँकेत रांगेत लागण्यात जात आहे.आधारबाबत जनजागृती नाहीदुर्गम भागातील नागरिक अजुनही फक्त बँक पासबुक किंवा जुन्या नोटा घेऊन बँकेत पोहचत आहेत. आधारकार्डबाबत जनजागृती नसल्याने आधारकार्ड न आणताच बँकेत येत आहे. त्यामुळे अशांना आल्यापावली परत जाऊन दुसऱ्या दिवशी आधारकार्ड घेऊन बँकेत यावे लागत आहे. त्यानंतरही बँकेच्या काऊंटरवर गेल्यास झेरॉक्स द्यावी लागत असल्याने रांगेत लागलेला नंबर मागे पडतो. पाचशे द्या, चारशे घ्या३०-३५ किमी अंतरावर जाऊन नोटा बदलविण्यासाठी बँकेत रांगेत लागून राहणे खर्चीक व वेळखाऊ ठरत असल्याने अनेकजण पाचशे रुपये घेऊन चारशे रुपये परत करीत आहेत. त्यामुळे मेहनतीचे पैसे वाया जात असल्याचे नागरिक सांगतात. सहकारी बँका म्हणतात, आरटीजीएस कराग्रामीण भागातील जनतेला आरटीजीएस काय आहे अजून माहित नाही. जिल्हा सहकारी बँकांना पैसा न पोहोचल्याने ते ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याची स्थिती आहे. अशातच तुमच्या खात्यातील रक्कम आरटीजीएस करून राष्ट्रीयकृत बँकेतून रक्कम उचला, असा सल्ला देण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकेचे खातेदार नसल्याने आरटीजीएसच्या सुविधेला अनेकांना मुकावे लागत आहे.