शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, नागरिकांच्या दुर्लक्षामुळे बाधितांची संख्या वाढू लागली. नियमांचे उल्लंघन करून वाटेल त्या पद्धतीने फिरताना दिसत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व चंद्रपूर मनपा क्षेत्रात आयुक्त राजेश मोहिते यांच्या देखरेखीखाली तपासणी पथके तयार करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे पथक सज्ज : मास्क लावला नाही तर ५०० रूपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित राहावी, यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र,   याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने सर्व सार्वजनिक ठिकाणांची कडक तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनान शनिवारी पथक तयार केले. या पथकाकडून विवाहसोहळे, मंगल कार्यालय, जिमखाना, नाईट क्लब, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे, खेळाची मैदाने, बगीचा, शॉपिंग मॉल्स व खासगी कार्यालयांची तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक, घराबाहेर व लोकांचा वावर असलेल्या ठिकाणी मास्क लावला नाही आणि अशा ठिकाणी थुंकताना आढळल्यास ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, नागरिकांच्या दुर्लक्षामुळे बाधितांची संख्या वाढू लागली. नियमांचे उल्लंघन करून वाटेल त्या पद्धतीने फिरताना दिसत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व चंद्रपूर मनपा क्षेत्रात आयुक्त राजेश मोहिते यांच्या देखरेखीखाली तपासणी पथके तयार करण्यात आली. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात दररोज तपासणी करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर   कारवाईचे निर्देश दिले.

विवाह सोहळ्यासाठी ५० व्यक्तींचीच मर्यादालग्न व इतर तत्सम कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींची मर्यादा ठेवण्यात आली. इतर सभा, बैठका, सामूहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात बंदिस्त सभागृहात २५ टक्के अथवा १०० व्यक्तींपैकी कमी मर्यादा आहे. कार्यक्रमासाठी पोलीस विभागाची परवानगी बंधनकारक आहे.

२४ तासात २२ कोरोनाबाधितचंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १८ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. २२ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ३३९ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८२१ झाली आहे. सध्या १२२ बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख आठ हजार ९२७ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी एक लाख ८३ हजार ९८५ नमुने निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९६ बाधितांचे मृत्यू झाले .

सभागृह, मंगल कार्यालयावर निर्बंध कोरोनाचे नियम न पाळल्यास सभागृह, मंगल कार्यालय, लॉन जागेचे मालक व व्यवस्थापकावर ५ हजार, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार व तिसऱ्यांदा २० हजार आणि कार्यक्रम आयोजकावरही १० हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे.  दरम्यान, नायब तहसीलदारांनी आज चंद्रपुरातील तुकूम मार्गावरील महेश भवन संचालकाकडून ५ हजाराचा दंड वसूल केला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या