शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

जिल्हा प्रशासनाला पडला ‘नो व्हेईकल डे’ चा विसर

By admin | Updated: December 22, 2016 01:43 IST

प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला ‘नो व्हेईकल डे’(वाहनविरहित दिवस) पाळण्याचा निर्णय

नागरिक निरुत्साही : अल्पकालावधीतच उपक्रम पडला बंद परिमल डोहणे  चंद्रपूर प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला ‘नो व्हेईकल डे’(वाहनविरहित दिवस) पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या घेतला होता. त्यावेळी अनेक मोठ्या अधिकाऱ्यांपासून सामान्य नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. मात्र अल्प कालावधीतच प्रशासनाला या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रदुषणात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. यावर अंकुश घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ डिसेंबर २०१५ पासून प्रत्येक महिन्यांच्या दुसऱ्या सोमवारला ‘नो व्हेईकल डे’ (वाहन विरहित दिवसाचा) संकल्प केला. त्यानूसार पेट्रोल, डिजेलवर चालणाऱ्या वाहनांचा प्रवास टाळून प्रत्येकाने महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला पायदळ अथवा सायकलने प्रवास करण्याचा संकल्प केला. काही दिवस ही संकल्पना सुरळीत चालली. मात्र अल्प कालावधीतच प्रशासनासोबतच सामान्य नागरिकांनासुद्धा नो व्हेईकल डे चा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ‘नो व्हेईकल डे’ ची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक म्हैसकर यांच्या पुढाकाराने सुरुवात करण्यात आली होती. त्यासोबतच विविध प्रभागाचे अधिकारी, पर्यावरणवादी तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मोहिमेसाठी पुढाकार घेतला होता. याबाबत जनजागृती करण्यासाठी १४ डिसेंबर २०१५ ला गांधी चौकातून आझाद बाग, जटपूरा गेट या मुख्य मार्गाद्वारे सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अनेकजण सायकलने आपले कार्यालय गाठले.तसेच सदर विषयावर परिसंवादाचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहनाची संख्या वाढत आहे. वाहनातून निघणाऱ्या धुरांमुळे वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना श्वसनासंबंधीचे रोग होत आहेत. त्यावर आढा घालण्यासाठी सदर योजनेला सुरुवात करण्यात आली होती. पण अल्पकालावधीतच प्रशासनाला या मोहिमेचा विसर पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बंद पडलेला उपक्रम पुनश्च सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.