शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

जिल्ह्यात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:24 IST

शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

ठळक मुद्देलाभ घ्यावा : गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मागील वर्षात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा झाला होता. तर चालू आर्थिक वर्षात या मोहिमेचा बुधवारपासून शुभारंभ करण्यात आला असून नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा अव्वलस्थानी आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अनेक तलावामधील गाळीचा उपसा झाला नव्हता. त्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता कमी झाली. परिणामी पावसाळा संपताच तलावातील जलसाठ्यात घट होत होती. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित केली. या योजनेतून २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील २२ तलावातील गाळ काढण्यात आला. त्यातील ३२ हजार ९५२ घनमीटर गाळीचा उपसा करण्यात आला. उपसा केलेला गाळ शेतकºयांनी स्वत:च्या शेतात टाकला. गाळ काढण्यात आलेल्या तलावामध्ये चंद्रपूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चिमूर, मूल या तालुक्यातील प्रत्येकी एक, गोंडपिपरी-चार, भद्रावती, नागभीड तालुक्यातील दोन तर ब्रह्मपुरी तालुक्यात तीन तलावातील गाळ उपसा करण्यात आला.गाळ काढण्यावर जवळपास ९ लाख ८८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असून या कामांना लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळाला. यंदा जवळपास ५० तलावातील गाळ उपसा केला जाणार असून जेसीबी मशीनद्वारे गाळ उपसा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:चे वाहन लावून आपल्या शेतात गाळ टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना फायदातलावातील निघालेला गाळ शेतकºयांना शेतात टाकण्यासाठी प्रशासनाकडून सवलत दिली जात आहे. शेतकऱ्यांने स्व:ताचे वाहन करून गाळ उचलावे. वाहतुकीसाठी लागणारा डिझेलचा खर्च जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.