शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जिल्ह्यात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:24 IST

शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

ठळक मुद्देलाभ घ्यावा : गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मागील वर्षात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा झाला होता. तर चालू आर्थिक वर्षात या मोहिमेचा बुधवारपासून शुभारंभ करण्यात आला असून नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा अव्वलस्थानी आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अनेक तलावामधील गाळीचा उपसा झाला नव्हता. त्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता कमी झाली. परिणामी पावसाळा संपताच तलावातील जलसाठ्यात घट होत होती. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित केली. या योजनेतून २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील २२ तलावातील गाळ काढण्यात आला. त्यातील ३२ हजार ९५२ घनमीटर गाळीचा उपसा करण्यात आला. उपसा केलेला गाळ शेतकºयांनी स्वत:च्या शेतात टाकला. गाळ काढण्यात आलेल्या तलावामध्ये चंद्रपूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चिमूर, मूल या तालुक्यातील प्रत्येकी एक, गोंडपिपरी-चार, भद्रावती, नागभीड तालुक्यातील दोन तर ब्रह्मपुरी तालुक्यात तीन तलावातील गाळ उपसा करण्यात आला.गाळ काढण्यावर जवळपास ९ लाख ८८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असून या कामांना लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळाला. यंदा जवळपास ५० तलावातील गाळ उपसा केला जाणार असून जेसीबी मशीनद्वारे गाळ उपसा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:चे वाहन लावून आपल्या शेतात गाळ टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना फायदातलावातील निघालेला गाळ शेतकºयांना शेतात टाकण्यासाठी प्रशासनाकडून सवलत दिली जात आहे. शेतकऱ्यांने स्व:ताचे वाहन करून गाळ उचलावे. वाहतुकीसाठी लागणारा डिझेलचा खर्च जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.