शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बल्लारपुरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

By admin | Updated: October 19, 2015 01:38 IST

येथील एका घरगुती वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १३ हजार २९० रुपये आकारण्यात आले.

एका महिन्याचे बिल १३ हजार : न्यायासाठी ग्राहकाची पायपीटबल्लारपूर : येथील एका घरगुती वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १३ हजार २९० रुपये आकारण्यात आले. यामुळे वीज ग्राहकात असंतोष पसरला असून यासंदर्भात महावितरण कंपनी कार्यालयाचा न्यायासाठी उंबरठा गाठला. मात्र मागील आठ महिन्यांपासून त्यांना न्याय मिळाला नाही. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.येथील गौरक्षण वॉर्डातील राजू कुंचलवार यांनी घरगुती वापरासाठी डिसेंबर २०१४ मध्ये वीज मीटर घेतला. त्यांना पहिल्याच महिन्यात १ हजार ३१८ युनिट वापर झाल्याचे वीज देयक देण्यात आले. महावितरण कंपनीने या वीज ग्राहकांवर १३ हजार २९० रुपये वीज शुल्क आकारुन अकलेचे दिवे तोडले. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता बल्लारपूर कार्यालयात १७ मार्च २०१५ रोजी अर्ज सादर करुन न्याय देण्याची विनंती केली. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आजतागायत लक्ष दिलेच नाही.अशातच अधिकाऱ्यांची राजू कुंचलवार यांना १३ हजार ५५० रुपये वीज शुल्क भरण्यास प्रवृत्त केले. विजेची गरज म्हणून त्यांनी पूर्ण रक्कम भरली. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढे येणाऱ्या बिलात बील कमी करण्याचे आश्वासन दिले. नवीन वीज मिटरच्या रिडिंगनुसार वीज देयक आकारले जाणार, याची शाश्वती दिली. मात्र अद्यापही नवीन मीटर रिडिंगनुसार रक्कम कमी करण्यात आलेली नाही. यामुळे वीज ग्राहकात तीव्र नाराजी पसरली आहे.अशातच महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात जास्त युनिट वापरल्याचे दाखविणाऱ्या मीटरची तपासणी करण्यासंदर्भात मीटर जमा केला. त्यासाठी ६ आॅक्टोबर २०१५ ला अर्ज सादर करुन मीटर तपासणीचा व कोणत्या दिवशी किती युनिट वापरण्यात आले, याची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार राजू कुंचलवार यांना कार्यालयात बोलाविण्यात आले. त्यावेळी मीटर बरोबर असल्याचे सांगून परत पाठविले. मात्र ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या वीज वापराचा अहवाल देण्यास महावितरण कंपनीने नकार दिला. वीज युनिट वापर झाल्याबाबत तपासणी करणारी यंत्रणा नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकाला १३ हजार ५५० रुपये एका महिन्याचे वीज बिल भरावे लागले, ही ग्राहकांची पिळवणूक आहे. यामुळे वीज ग्राहकात संताप पसरला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी वीज ग्राहकाने केली आहे. (शहर प्रतिनिधी)