शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

बल्लारपुरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

By admin | Updated: October 19, 2015 01:38 IST

येथील एका घरगुती वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १३ हजार २९० रुपये आकारण्यात आले.

एका महिन्याचे बिल १३ हजार : न्यायासाठी ग्राहकाची पायपीटबल्लारपूर : येथील एका घरगुती वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १३ हजार २९० रुपये आकारण्यात आले. यामुळे वीज ग्राहकात असंतोष पसरला असून यासंदर्भात महावितरण कंपनी कार्यालयाचा न्यायासाठी उंबरठा गाठला. मात्र मागील आठ महिन्यांपासून त्यांना न्याय मिळाला नाही. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.येथील गौरक्षण वॉर्डातील राजू कुंचलवार यांनी घरगुती वापरासाठी डिसेंबर २०१४ मध्ये वीज मीटर घेतला. त्यांना पहिल्याच महिन्यात १ हजार ३१८ युनिट वापर झाल्याचे वीज देयक देण्यात आले. महावितरण कंपनीने या वीज ग्राहकांवर १३ हजार २९० रुपये वीज शुल्क आकारुन अकलेचे दिवे तोडले. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता बल्लारपूर कार्यालयात १७ मार्च २०१५ रोजी अर्ज सादर करुन न्याय देण्याची विनंती केली. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आजतागायत लक्ष दिलेच नाही.अशातच अधिकाऱ्यांची राजू कुंचलवार यांना १३ हजार ५५० रुपये वीज शुल्क भरण्यास प्रवृत्त केले. विजेची गरज म्हणून त्यांनी पूर्ण रक्कम भरली. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढे येणाऱ्या बिलात बील कमी करण्याचे आश्वासन दिले. नवीन वीज मिटरच्या रिडिंगनुसार वीज देयक आकारले जाणार, याची शाश्वती दिली. मात्र अद्यापही नवीन मीटर रिडिंगनुसार रक्कम कमी करण्यात आलेली नाही. यामुळे वीज ग्राहकात तीव्र नाराजी पसरली आहे.अशातच महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात जास्त युनिट वापरल्याचे दाखविणाऱ्या मीटरची तपासणी करण्यासंदर्भात मीटर जमा केला. त्यासाठी ६ आॅक्टोबर २०१५ ला अर्ज सादर करुन मीटर तपासणीचा व कोणत्या दिवशी किती युनिट वापरण्यात आले, याची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार राजू कुंचलवार यांना कार्यालयात बोलाविण्यात आले. त्यावेळी मीटर बरोबर असल्याचे सांगून परत पाठविले. मात्र ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या वीज वापराचा अहवाल देण्यास महावितरण कंपनीने नकार दिला. वीज युनिट वापर झाल्याबाबत तपासणी करणारी यंत्रणा नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकाला १३ हजार ५५० रुपये एका महिन्याचे वीज बिल भरावे लागले, ही ग्राहकांची पिळवणूक आहे. यामुळे वीज ग्राहकात संताप पसरला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी वीज ग्राहकाने केली आहे. (शहर प्रतिनिधी)