शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. गटविमा लाभार्थ्यांची अंतिम देयके सादर करताना चुकांचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST

आदिवासी किंचा नक्षलग्रस्त भागातील कार्यालयात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे या क्षेत्रातील कार्यकालासाठी एकस्तर पदोन्नती योजनेचा लाभ दिला जातो. ...

आदिवासी किंचा नक्षलग्रस्त भागातील कार्यालयात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे या क्षेत्रातील कार्यकालासाठी एकस्तर पदोन्नती योजनेचा लाभ दिला जातो. पदोन्नतीच्या अनुषंगाने वरिष्ठ गटातील वेतनश्रेणी लागू होते. अशा कर्मचाऱ्यांची गट विमा योजनेची वर्गणी काही कार्यालयतंर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीच्या (एकस्तर पदोन्नतीच्या) वर्गाच्या अनुषंगाने कपात केले जाते. परिणामी, त्याचा अनावश्यक आर्थिक भार गटविमा योजनेच्या विमा निधीवर पर्यायाने शासनावर येतो, याकडे राज्य लेखा व कोषागरे विभागाने लक्ष वेधले होते. चंद्रपूर जि. प. अंतर्गत गटविमा लाभार्थ्यांची अंतिम देयके वित्त विभागाला सादर करताना बºयाच चुका होत आहेत. गटविमा प्रस्तावात कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, मृत असल्यास वारसदाराचे नाव, मागणीदाराची स्वाक्षरी, मुद्रांक चिठ्ठीवर कर्मचाऱ्याची व त्याखाली कर्मचाऱ्याचे नावही नमूद केले जात नाही. कार्यालय प्रमुखांनी साक्षांकित केलेली गटविमा मंजूर आदेश व रकम तपासताना परिगणनाही चुकीची असते. संपूर्ण माहितीही भरली जात नसल्याने बरीच प्रकरणे कोषागारातून परत येतात व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. अशी प्रकरणे जि. प. मध्ये प्रलंबित आहेत. लाभार्थ्यांचीही नाराजी वाढल्याने मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी एक खरमरीत परिपत्रक काढून कार्यालय प्रमुखांकडे रवाना केले आहे.

बॉक्स

यापुढे चुका झाल्यास प्रस्ताव परत

प्रस्तावासोबत गटविमा देयक नमुना आठ पोच लिखित देयक, मागणी पत्र नमुना ३, कर्मचारी मृत असल्यास नमुना ५ व त्यासोबत नामनिर्देशन पत्र अथवा वारस पत्र, इतर सदस्यांचे संमती पत्र, गटविमा प्रमाणपत्र, सेवापुस्तकाची सत्यप्रत, गटविमा योजना सदस्यत्व देण्यात आल्याची नोंद, वर्गणी वाढीची नोंद, पदनाम व अन्य पुरावे जोडून चुका न करता प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना वित्त विभागाने केल्या आहेत. सर्व विभागातील कार्यालय प्रमुखांनी मूळ प्रस्ताव सादर करताना चुका केल्यास यापुढे उलटटपाली परत पाठविण्याची तंबी दिली.

कोट

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना गटविम्याचा लाभ मिळत नाही. प्रशासकीय दिरंगाई असे प्रकार घडत आहेत. कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास कुटुंबाला विमा रकमेचा मोठा आधार मिळतो. वित्त विभागाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन परिपत्रक जारी केले. विभाग प्रमुखांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.

-प्रकाश चुनारकर, राज्य सहकार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.), चंद्रपूर