शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

अधिवेशन चालू न देणे हा लोकसभेचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:06 IST

काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : भाजपच्या उपवास कार्यक्रमात आमदारांसह अनेक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.यापुढे असे होऊ देणार नाही. भाजपकडे बहुमत आहे. संसद चालू ठेवण्यात आम्हीही समर्थ आहोत. मात्र आम्ही हातापायीवर उतरणार नाही. म्हणूनच काँग्रेसच्या निषेधार्थ हा उपवास केला, असेही ना. हंसराज अहीर म्हणाले.चंद्रपूर येथील गांधी चौकात सकाळपासूनच केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उपवास कार्यक्रमाला बसले होते. त्यांच्या समवेत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जि.प. समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्यासह भाजपप्रणीत नगर परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, जि.प. व पं.स. सदस्य उपवास कार्यक्रमात सहभागी झाले होते.देशात काँग्रेस विरोधकांनाही उचकवून लावण्याचे काम करीत आहे. सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या मानसिकतेत होती. मात्र यांना संसदच चालू द्यायची नव्हती. आमच्यावर जनतेची जबाबदारी आहे. जनतेने निवडून दिलेले आहेत. विकासाच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व होते. देशात सर्व सुरळीत चालू आहे. एखाद जातीय दंगलीची अप्रिय घटना देशात घडते, ती आम्हालाही मान्य नाही, असेही ना. अहीर म्हणाले.आंदोलनात अप्रिय घटना घडत असेल, तर अशी आंदोलने व्हायला नको. तरीही राईचा पहाड करण्यासाठी अशी आंदोलने केली जाते. अशावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबंधित राज्याची असते. २ तारखेला झालेल्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र कायदा व व्यवस्था योग्यपणे हाताळली, याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले. सायंकाळी ५ वाजता उपवास कार्यक्रमाची ना. हंसराज अहीर यांच्या भाषणानंतर करण्यात आली. उपवास कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्यातील कार्यकर्ते गांधी चौकात दाखल झाले होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर