शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अधिवेशन चालू न देणे हा लोकसभेचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:06 IST

काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : भाजपच्या उपवास कार्यक्रमात आमदारांसह अनेक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.यापुढे असे होऊ देणार नाही. भाजपकडे बहुमत आहे. संसद चालू ठेवण्यात आम्हीही समर्थ आहोत. मात्र आम्ही हातापायीवर उतरणार नाही. म्हणूनच काँग्रेसच्या निषेधार्थ हा उपवास केला, असेही ना. हंसराज अहीर म्हणाले.चंद्रपूर येथील गांधी चौकात सकाळपासूनच केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उपवास कार्यक्रमाला बसले होते. त्यांच्या समवेत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जि.प. समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्यासह भाजपप्रणीत नगर परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, जि.प. व पं.स. सदस्य उपवास कार्यक्रमात सहभागी झाले होते.देशात काँग्रेस विरोधकांनाही उचकवून लावण्याचे काम करीत आहे. सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या मानसिकतेत होती. मात्र यांना संसदच चालू द्यायची नव्हती. आमच्यावर जनतेची जबाबदारी आहे. जनतेने निवडून दिलेले आहेत. विकासाच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व होते. देशात सर्व सुरळीत चालू आहे. एखाद जातीय दंगलीची अप्रिय घटना देशात घडते, ती आम्हालाही मान्य नाही, असेही ना. अहीर म्हणाले.आंदोलनात अप्रिय घटना घडत असेल, तर अशी आंदोलने व्हायला नको. तरीही राईचा पहाड करण्यासाठी अशी आंदोलने केली जाते. अशावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबंधित राज्याची असते. २ तारखेला झालेल्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र कायदा व व्यवस्था योग्यपणे हाताळली, याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले. सायंकाळी ५ वाजता उपवास कार्यक्रमाची ना. हंसराज अहीर यांच्या भाषणानंतर करण्यात आली. उपवास कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्यातील कार्यकर्ते गांधी चौकात दाखल झाले होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर