शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन चालू न देणे हा लोकसभेचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:06 IST

काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : भाजपच्या उपवास कार्यक्रमात आमदारांसह अनेक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.यापुढे असे होऊ देणार नाही. भाजपकडे बहुमत आहे. संसद चालू ठेवण्यात आम्हीही समर्थ आहोत. मात्र आम्ही हातापायीवर उतरणार नाही. म्हणूनच काँग्रेसच्या निषेधार्थ हा उपवास केला, असेही ना. हंसराज अहीर म्हणाले.चंद्रपूर येथील गांधी चौकात सकाळपासूनच केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उपवास कार्यक्रमाला बसले होते. त्यांच्या समवेत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जि.प. समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्यासह भाजपप्रणीत नगर परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, जि.प. व पं.स. सदस्य उपवास कार्यक्रमात सहभागी झाले होते.देशात काँग्रेस विरोधकांनाही उचकवून लावण्याचे काम करीत आहे. सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या मानसिकतेत होती. मात्र यांना संसदच चालू द्यायची नव्हती. आमच्यावर जनतेची जबाबदारी आहे. जनतेने निवडून दिलेले आहेत. विकासाच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व होते. देशात सर्व सुरळीत चालू आहे. एखाद जातीय दंगलीची अप्रिय घटना देशात घडते, ती आम्हालाही मान्य नाही, असेही ना. अहीर म्हणाले.आंदोलनात अप्रिय घटना घडत असेल, तर अशी आंदोलने व्हायला नको. तरीही राईचा पहाड करण्यासाठी अशी आंदोलने केली जाते. अशावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबंधित राज्याची असते. २ तारखेला झालेल्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र कायदा व व्यवस्था योग्यपणे हाताळली, याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले. सायंकाळी ५ वाजता उपवास कार्यक्रमाची ना. हंसराज अहीर यांच्या भाषणानंतर करण्यात आली. उपवास कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्यातील कार्यकर्ते गांधी चौकात दाखल झाले होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर