शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

न्यायप्रविष्ट जप्त मालमत्तेचीही लावता येणार विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:06 IST

‘न्यायप्रविष्ट प्रकरण’ या सदराखाली वनगुन्ह्यात जप्त केलेला कोट्यवधी रूपयांचा लाकूड व वाहने मागील अनेक वर्षांपासून खितपत पडली आहेत. दरम्यान, मुख्य वनसंरक्षकांनी ५ डिसेंबरला तोडगा काढून यासंदर्भात परिपत्रक जारी केले.

ठळक मुद्देमुख्य वनसंरक्षकांनी काढला तोडगादेखरेखीचा लाखोंचा खर्च वाचणार

लोकमत न्यूज नेटवर्कराजेश मडावीचंद्रपूर : नागपूर प्रादेशिक वनवृत्तातील आगारांमध्ये ‘न्यायप्रविष्ट प्रकरण’ या सदराखाली वनगुन्ह्यात जप्त केलेला कोट्यवधी रूपयांचा लाकूड व वाहने मागील अनेक वर्षांपासून खितपत पडली आहेत. या मालमत्तेची लिलावाद्वारे विल्हेवाट लावता येत नसल्याने वनाधिकारी कोंडीत सापडले होते. दरम्यान, मुख्य वनसंरक्षकांनी ५ डिसेंबरला तोडगा काढून यासंदर्भात परिपत्रक जारी केले. यामुळे अशा मालमत्तेची देखरेख व परिरक्षणाचा लाखो रूपयांचा खर्च वाचणार असून लिलावाद्वारे वन विभागाला कोट्यवधी रूपयांचा महसूलही मिळणार आहे.भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्ह्यात जप्त केलेला इमारत लाकूड (टिंबर) व वाहनांची प्रकरणे न्यायप्रविष्ठ झाल्यास लिलाव करता येत नव्हते. अशी मालमत्ता वर्षानुवर्षे आगारातच पडून आहे. नागपूर प्रादेशिक वनवृत्ताच्या जिल्ह्यांतील आगारात कोट्यवधी रूपयांची मालमत्ता कुजण्याच्या अवस्थेत आहे. लिलावाअभावी मालमत्तेचा दर्जा खालवून योग्य किंमत मिळत नसल्याने वन विभागाचे आर्थिक नुकसान होत आहे. देखरेख व परिक्षणाचा लाखो रूपयांचा खर्चही वाया जात होता. दरम्यान, भारतीय वन अधिनियमातील कलम ६१-जी व कलम ७१-ए (३) मधील तरतूदींचा संयुक्त विचार करून मुख्य वनसंरक्षकांनी जप्त मालमत्तेच्या विल्हेवाटीकरिता तोडगा काढला. ५ डिसेंबरला यासंदर्भात परिपत्रक जारी केल्याने नागपूर वनवृत्तातील वनाधिकाऱ्यांनी आता सुटकेचा श्वास टाकला आहे.उपवनसंरक्षकांनाच हाताळावा लागेल एक प्रकरणइमारत लाकूड, जळाऊ लाकूड, चंदन लाकूड तसेच कोळसा आदी वनउपजासंदर्भात गुन्हा घडला असेल अशा वनगुन्ह्यात ५२ (१) अंतर्गत जप्त केलेली मालमत्ता शासकीय असेल आणि जर कलम ६१-सी खाली पुनर्विलोकनाची प्रक्रिया तसेच कलम ६१-डी खाली अपिलाची प्रक्रीया सुरू नसेल तर वनगुन्ह्यात जप्त वनोपजासंबंधी व अशा वनगुन्ह्यात वापरलेल्या मालमत्तेसंबंधी विल्हेवाटीचा निर्णय घेण्यासाठी प्रधिकृत अधिकारी (सहाय्यक वनसंरक्षक तथा उपवनसंरक्षक) हे सक्षम आहेत. यासंदर्भात न्यायालयात खटला दाखल असो व नसो पण प्राधिकृत अधिकाºयांच्या कार्यवाहीला मुळीच बाधा येणार नाही. मात्र, अधिनस्थ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, याकरिता किमान एक प्रकरण स्वत: उपवनसंरक्षकांनीच हाताळावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.वनगुह्यातील प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याची कारणे नमुद करून अशा मालमत्तेच्या विल्हेवाटीबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याचे नागपूर वनवृत्तात निर्देशनात आले. यामुळे भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वैधानिक तरतुदींच्या आधारावर सदर निर्णय घेण्यात आला आहे.संजीव गौड, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर

टॅग्स :forestजंगल