बल्लारपूर : राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय बल्लारपूर येथे लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच या वर्षाची शेवटची लोक अदालत पार पडली. यामध्ये विविध प्रकरची १५३ प्रकरणाचा निपटारा करुन पक्षकारांना न्याय देण्यात आला. लोकअदालतमध्ये तालुका विधी समिती व दिवाणी न्यायधीश क स्तर व्ही. व्ही. चौधरी, पॅनल ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी बोडा, सामाजिक कार्यकर्त्या खनके उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये ड्रंक अँड ड्राइव्हच्या १२३, घरगुती हिंसाचाराच्या तीन, दिवाणी एक, क्राईमच्या २३, चेक बाऊंसच्या तीन अशी एकूण १५३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतमध्ये ॲड. इनायत अली सय्यद, किशोर पुसलवार, ॲड. विकास गेडाम, अरविंद तितरे, विशाल मून, संदेश हस्ते, सुनील पुरी, संदीप येरमे, ॲड. काकडे, खनके, आदित्य खरतड, ॲड. ज्योती इंगळे व इतर वकिलांनी लोक अदालतीला सहकार्य केले.
बल्लारपूर येथील लोकअदालतमध्ये १५३ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST