शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

लाल्या रोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील पाच गावातील धानाची शेती उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी लाल्या, मावा तुडतुडा रोगाने हवालदिल झाले. या कीडींचा कहर सुरू आल्याने बंदर, खडसंगी, भानसुली, माजरा व मुरपार परिसरातील धानाची शेती उद्ध्वस्त होणयाच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देतोंडाशी आलेला घास हिरावला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे आर्थिक दुष्टचक्रात अडकलेले लहान-मोठे व्यावसायिक बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतानाच तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी लाल्या, मावा तुडतुडा रोगाने हवालदिल झाले. या कीडींचा कहर सुरू आल्याने बंदर, खडसंगी, भानसुली, माजरा व मुरपार परिसरातील धानाची शेती उद्ध्वस्त होणयाच्या मार्गावर आहे.झाडीपट्टीचा एक भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुरूवातीपासूनच पुरेसा पाऊस झाल्याने धानाचे उत्पादन चांगले येईल, या आशेवर शेतकरी होते.

सद्यस्थितीत हलका व मध्यम धान कापणीसाठी आला आहे. मात्र जड वाणाचे धान कापण्याला २० ते २० दिवसांचा कलावधी आहे. कापणीसाठी आलेल्या धानावर लाल्या, मावा व तुडतुडा रोगाने आक्रमण केले. परिणामी, या रोगाचे बाधित क्षेत्र शेकडो हेक्टर झाल्याचे दिसून येत आहे. धानावर रोग येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक औषधी फवारणी केली. परंतु, काहीही बदल झाला नाही. त्यामुळे तोंडाजवळ आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जाण्याची भीती वर्तवली जात आहे. असे घडल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना यंदाही कर्जातच जगावे लागणार आहे. शासनाने तालुक्यातील धान पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई देण्याची मागणी बंडू तराळे, अशोक श्रीरामे, कवडू दडमल, वैभव गायकवाड आदी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहेकृषी विभागाचे दुर्लक्षबंदर येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी धानावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी केली. मात्र याला न जुमानता मावा तुडतुडा रोगाने पुन्हा शेकडो हेक्टर क्षेत्र बाधीत केले. कीड रोगाची माहिती कृषी विभागाला देण्यात आली. मात्र कुणीही बांधावर येऊन मार्गदर्शन केले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कीडरोग नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली. पण उपयोग झाला नाही. अशावेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. याकडे कदापि दुर्लक्ष करू नये, अशा सूचना दिल्या. यंदा ब?्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून धानाची शेती केली. पीक हाती आले नाही तर जगायचे कसे हा प्रश्न सतावणार आहे.-अजहर शेख, सदस्य पंचायत समिती सदस्य, खडसंगी

टॅग्स :agricultureशेती