शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ तेलुगू समाजम्च्या सभेत विविध विषयांवर चर्चा

By admin | Updated: May 15, 2014 01:02 IST

तेलगु बांधवांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

चंद्रपूर : तेलगु बांधवांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चाकरण्यात आली.अध्यक्षस्थानी किशोर पोतनवार होते. यावेळी तेलगु विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला महासचिव लाजर कांबळे, जिल्हाध्यक्ष आनंद अंगलवार, विदर्भ संघटक राजेश पुल्लरी, उपाध्यक्ष नमिल्ला, तिरुपती पोट्टाला, सागर गंधम, राजन्ना भंडारी, राजेश गडपल्लीवार, मल्लेश कमटम, सतीश दासरवार, पोचम येमुलवार, बाळू कांबळे, अंकम आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.शाळा, विद्यालयाच्या परीक्षा आटोपल्या असून विद्यार्थी पालकांची प्रवेशासाठी धडपड सुरु आहे. विदर्भात तेलगू भाषिकांचे पाल्य शाळांमधून उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. समाजकल्याण विभागाकडून जातवैधता प्रमाणपत्र मिळत नाही. शंभर वर्षाहून अधिक काळापासून महाराष्ट्रात वास्तव्याला असणार्‍या तेलगू बांधवांच्या पाल्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळत नाही. ज्या नोकरदारांनी जात वैधता प्रमाणपत्र प्रबंधनाकडे सादर केले नाही. त्यांना नोकरीतून काढून टाकण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे हजारो नोकर्‍या धोक्यात आल्या. याबाबतविदर्भ तेलगू समाज संघर्ष करणार असल्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील एक मुलगी मुंबईला परिचारिकेची नोकरी करते. मात्र, तिला तिचे आई-वडील आंध्रमधून आले, या सबबीखाली जातवैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तिची बढती रोखण्यात आली.महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने वास्तव्याला असणार्‍या तेलगू बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोळसा खाणींच्या हद्दीत नझूल जमिनीवर, शासकीय जमिनीवर स्वत:चे घर बांधून राहणार्‍या नवृत्त अथवा कार्यरत कामगाराना पट्टे देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अधुरे आहे.वनविभागाच्या जमिनीवर तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुण शेती करणार्‍या तेलगू बांधवांना वनहक्काचे पट्टे देण्यात येत नाही. अनुसूचित जाती-जमातीमध्ये मोडणार्‍या तेलुगू बांधवांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. सभेला मोठय़ा संख्येने समाजबांधव उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)