शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्यांगांचा निधी खर्च न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:42 IST

दिव्यांगांच्या कल्याणासाठी योजना राबविताना वार्षिक आराखड्यानुसार निधी खर्च केला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ग्रामविकास विभागाने निधीच्या स्वरूपातही बदल केला. यासंदर्भात नवी मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केले. त्यामुळे दिव्यांगांचा निधी इतरत्र वळविण्याला चाप बसण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देग्रामविकास विभागाचा आदेश : निधीमध्ये दोन टक्क्यांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिव्यांगांच्या कल्याणासाठी योजना राबविताना वार्षिक आराखड्यानुसार निधी खर्च केला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ग्रामविकास विभागानेनिधीच्या स्वरूपातही बदल केला. यासंदर्भात नवी मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केले. त्यामुळे दिव्यांगांचा निधी इतरत्र वळविण्याला चाप बसण्याची आशा निर्माण झाली आहे.दिव्यांगांच्या कल्याणासाठी पंचायत राज संस्थांना स्वत:च्या उत्पन्नातून यापूर्वी ३ टक्के निधी खर्च करण्याचा नियम होता. यामध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार हा निधी आता ५ टक्के करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेला स्वतंत्र अपंग कल्याण निधी तयार करावा लागेल. हा निधी त्याच वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे. निधी खर्च न झाल्यास शिल्लक निधी जिल्हा अपंग निधीमध्ये जमा करण्याचे निर्देशही ग्रामविकास विभागाने २५ जूनला जारी केले. यापूर्वी जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींकडून कल्याणाकारी योजना राबविल्या जात होत्या. पण काटोकोर अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांगांना योजनांपासून वंचित राहावे लागत होते. दिव्यांगांच्या व्यक्तिगत व सामूहिक विकासाच्या योजनांचे नियोजन करून योजना राबविताना दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तीव्र नाराजी पसरली होती. दिव्यांगांच्या हितासाठी कार्य करणाºया संस्थांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. दिव्यांगांचा निधी राखीव ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी जि. प. कडून प्रयत्न सुरू होते. मात्र, बºयाच पंचायतींनी हा निधी खर्च केला नाही. दिव्यांगाच्या कल्याणार्थ ५ टक्के निधी स्व:उत्पन्नातून राखीव ठेवावा लागणार आहे. या निधीतून दिव्यांगासाठी सामूहिक योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, अंध व्यक्ती, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग, कुष्ठरोगमुक्त, अपंग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना राबवाव्या लागणार आहे. अपंग निधीमधील ५ टक्के रक्कम दिव्यांगाच्या वैयक्तिक लाभ तसेच ५० टक्के निधी पायाभूत सोयी सुविधांवर खर्च करणे बंधनकारक आहे.राखीव निधी त्याच वित्तीय वर्षात खर्च करायचा आहे. निधी खर्च झाला नाही तर निधी अपंग कल्याण निधीत जमा करण्याची सक्ती करण्यात आली. याआधी दिव्यांगांच्या विकासासाठी ३ टक्के निधीची तरतुद होती. या निधीत वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी राज्य शासनाकडे केली होती. दरम्यान, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे, यांच्याकडेही निवेदन देण्यात आले होते. जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही पाठपुरावा केला होता.दिव्यांगांची यादी तयार करावीस्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या परिसरातील दिव्यांगांची यादी तयार करण्याचा आदेश शासनाने दिला होता. मात्र, अनेक संस्थांनी दुर्लक्ष केले. परिणामी जिल्ह्यात दिव्यांगांची संख्या किती याची माहिती उपलब्ध नाही. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यास प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप दिव्यांग कल्याणकारी संघटनेने केला आहे. राज्य शासनाने नवे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले. यामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. प्रत्येक स्वराज्य संस्थेने योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली.स्वराज्य संस्थांचा निधी अखर्चितजिल्ह्यातील ८२७ पैकी बऱ्याच ग्रामपंचायतींनी दिव्यांगांचा ३ टक्के निधी कल्याणकारी योजनांवर खर्च केला नाही. पंचायत समिती व काही नगर परिषदांनीही याकडे दुर्लक्ष केले. शासनाने आता ५ टक्के निधीची तरतूद केली. परंतु अंमलबजावणी होईल का, असा प्रश्न दिव्यांग विचारत आहेत. एकूण उत्पन्नातील ५ टक्के निधी खर्च करण्याकडे चंद्रपूर मनपानेही कानाडोळा केला आहे. प्रशासनाने केवळ योजनांचा आराखडा तयार करून ठेवला आहे.जिल्हा परिषदकडून दिव्यांग व्यक्तींसाठी आता ५ टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनीही हा निधी कटाक्षाने दिव्यांग योजनांसाठी वापरावा. योजनांचा दर महिन्याला आढावा घेण्यात येईल.- ब्रिजभूषण पाझारेसभापती समाजकल्याण, जि. प.