शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मातृत्व अनुदानापासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:00 IST

गरोदर मातेला पोषक आहार खरेदी करता यावा, तसेच गरोदरपणाच्या कालावधीत तिला मोलमजुरी करावी लागू नये, यासाठी केंद्र शासनामार्फत मातृत्व अनुदान योजना (प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना) राबविली जाते. या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यातील स्थिती : वर्षभराचा कालावधी उलटूनही लाभ मिळाला नाही; अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : गरोदर मातेला पोषक आहार खरेदी करता यावा, तसेच गरोदरपणाच्या कालावधीत तिला मोलमजुरी करावी लागू नये, यासाठी केंद्र शासनामार्फत मातृत्व अनुदान योजना (प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना) राबविली जाते. या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र वर्षभरापासून अहेरी तालुक्यातील ५०० च्या वर लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहिले आहे.प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजनेचा लाभ महिला गरोदर असल्यापासून बाळंतपणापर्यंत तीन टप्प्यात वितरित केला जातो. गरोदर असल्याची अंगणवाडी सेविकेकडे नोंद झाल्यानंतर एक हजार रुपये संबंधित मातेच्या बँक खात्यात जमा केले जातात. त्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी दोन हजार रुपये व बाळंतपण झाल्यानंतर दोन हजार रुपये असा एकूण पाच हजार रुपयांचा लाभ दिला जातो. मातृत्व अनुदान योजनेचा लाभ संबंधित मातेच्या बँक खात्यात जमा होतो. त्यामुळे नोंदणी करतेवेळी बँक खात्याची झेरॉक्स, आधारकार्ड आदी कागदपत्रे संबंधित अंगणवाडी सेविकेकडे द्यावी लागतात. मात्र काही महिलांनी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. विशेष म्हणजे काही महिलांचे बाळ एक वर्षाचे होऊन सुद्धा लाभ दिला नाही. काही लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली. मात्र त्यांनाही लाभ देण्यात आला नाही. अहेरी, आलापल्ली शहरातीलही अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. कागदपत्रे गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोजीरोटी करून जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलेला गरोदरपणातही काम करावे लागते. तसेच गरोदरपणात आवश्यक असलेला पोषक आहार सुद्धा खरेदी करू शकत नाही. त्यामुळ बाळ कुपोषित जन्माला येण्याची शक्यता राहते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने मातृत्व अनुदान योजना सुरू केली आहे. अहेरी तालुक्यातील अनेक महिला या योजनेसाठी पात्र ठरतात. मात्र त्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही.अनेक महिलांकडे बँकेचे खाते राहत नाही. मात्र अनुदान मिळेल, या आशेने महिला ३० ते ४० किमीची पायपीट करून बँक खाते काढतात. बँक खाते काढण्यासाठी मजुरीही बुडवावी लागते. तरीही त्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याने प्रशासनाप्रती लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. योजना जरी चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू२०१८-१९ या वर्षात अहेरी तालुक्याचा एकूण १ हजार ८९ बाळंतपण झाले. डिसेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे १ हजार १३८ व मानव विकास मिशनचे ५२९ असे एकूण १ हजार ६६७ लाभार्थी पात्र ठरले. त्यापैकी १२ हजार ९५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. ३७२ लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. अर्जांमधील त्रुटी दूर करून नव्याने अर्ज सादर करण्यास कळविण्यात आले आहे. योजनेच्या लाभासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते नाही. त्यांच्याकडे सहकारी बँकेचे खाते आहे. या खात्यांमध्ये अनुदान जमा करण्याची परवानगी द्यावी, याबाबत पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांनी दिली.