शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

दिंडोरा बॅरेजला पर्यावरण खात्याची आडकाठी

By admin | Updated: December 3, 2014 22:46 IST

वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील ६३३६ हेक्टर शेतीला वरदान ठरणारा दिंडोरा बॅरेज सिंचन प्रकल्प गत पाच वर्षापासून रखडला आहे. बॅरेजच्या कामासाठी राज्य पर्यावरण खात्याची मंजूरी नसल्याने बॅरेजचे

मंगेश भांडेकर - चंद्रपूरवर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील ६३३६ हेक्टर शेतीला वरदान ठरणारा दिंडोरा बॅरेज सिंचन प्रकल्प गत पाच वर्षापासून रखडला आहे. बॅरेजच्या कामासाठी राज्य पर्यावरण खात्याची मंजूरी नसल्याने बॅरेजचे कोणतेही काम हाती घेण्यात आलेले नाही. सिंचन विभागाकडून मात्र, पर्यावरण खात्याच्या मान्यतेसाठी पाच वर्षांपासून केवळ पाठपुरावाच सुरु आहे. वरोरा तालुक्यातील सोईट-दिंडोरा गावाजवळ वर्धा नदीवर दिंडोरा बॅरेज प्रकल्प प्रस्तावित आहे. या बॅरेजची सिंचन क्षमता ६३३६ एवढी असून ४८०० हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. ६ जुलै २००९ ला या बॅरेजच्या कामाला शासनाकडून मंजूरी मिळाली. बॅरेज कामासाठी शासनाने ४७६.८१ कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, राज्य पर्यावरणण खात्याची मंजूरी न मिळाल्याने बॅरेज काम रखडले आहे. दिंडोरा बॅरेज बांधकामासाठी २५३७ हेक्टर जमीनीची गरज आहे. यात खाजगी ११८१.२८ हेक्टर, राजस्व १२५९.९८ हेक्टर तर ९५.८१ हेक्टर वनजमीनीची आवश्यकता आहे. बॅरेजमुळे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या तिनही जिल्ह्यातील शेतीला फायदा होणार असल्याने तिनही जिल्ह्यातील शेती बी-लॅड या उपशिर्षा अंतर्गत बॅरेज करीता घेण्यात आली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील १३८५.९७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील ३६८.१० हेक्टर तर चंद्रपूर जिल्ह्यातील ७८३ हेक्टर जमीनीचा समावेश आहे. या कार्यवाहीत तिनही जिल्ह्यातील ३२ गावच्या ११६७ शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार आहेत. पुनर्वसनाची मात्र कोणताही अडचण नाही. दिंडोरा बॅरेज प्रकल्पाला ११ नोव्हेंबर १९९९ ला केंद्राकडून एमओईएफ पर्यावरण मान्यता असून सुधारीत पर्यावरण मान्यतेचा प्रस्ताव ५ जून २०१२ ला सचिव पर्यावरण विभाग मुंबई यांना सादर केलेला आहे. सध्यास्थितीत टीओआर क्रमांक प्राप्त असून प्रकल्पाला राज्य पर्यावरण विभागाच्या मान्यतेची प्रतिक्षा आहे. या प्रकल्पाला पर्यावरण खात्याची मंजूरी मिळाल्यास वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे.