शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वेगळा विदर्भ हाच पर्याय

By admin | Updated: November 2, 2014 22:31 IST

विदर्भावर झालेल्या अन्यायाला मोठा इतिहास आहे. त्यामागे पश्चिम महाराष्ट्राचे आणि मुंबईतील अर्थकारणाचे राजकारण आहे. राज्यात स्थापन झालेले नवे सरकार ही स्थिती कशी

श्रीहरी अणे : चंद्रपुरात ‘विकास विदर्भाचा’ या विषयावर व्याख्यानचंद्रपूर : विदर्भावर झालेल्या अन्यायाला मोठा इतिहास आहे. त्यामागे पश्चिम महाराष्ट्राचे आणि मुंबईतील अर्थकारणाचे राजकारण आहे. राज्यात स्थापन झालेले नवे सरकार ही स्थिती कशी सोडविणार याचे आपणासही कुतूहल आहे. विदर्भाला न्याय देण्यासाठी राज्य सरकारला प्रचंड ऊर्जा स्वत:मध्ये निर्माण करावी लागेल. मात्र ती ताकद नव्या सरकारातदेखील आहे का, या बद्दल आपण साशंक आहोत, असे प्रतिपादन करीत ज्येष्ठ विधिज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे जोरदार समर्थन केले.चांदा शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे यांनी १ नोव्हेंबरच्या सायंकाळी चंद्रपुरात आयोजित केलेल्या ‘विकास विदर्भाचा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रविंद्र भागवत होते. मंचावर डॉ. अशोक जिवतोडे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या दीड तासांच्या दीर्घ व्याख्यानात विविध दाखले आणि आकेवारी मांडून अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी श्रोत्यांना प्रभावित केले. ते म्हणाले, या सरकारच्या काळात बदल दिसतीलही. मात्र ते मोठ्या प्रमाणावर करावे लागतील. विदर्भावरील अन्यायामुळे खोल दरी पडली आहे. ती भरून काढण्यासाठी प्रयत्न होतील तरी, वेगळ्या विदर्भाशिवाय दुसरा पर्यायच नाही. आजवर मुंबईच्या अर्थशक्तीचे प्रलोभन विदर्भाला दाखविण्यात आले. विदर्भाच्या झुकत्या मापाचे दोन दिवसांचे विधानसभेतील यशवंतराव चव्हाण यांचे भाषण विदर्भाने ऐकले. मात्र आम्ही अहिल्येची शिळाच राहिलो. कुणाचाही उद्धारक अंगठा आम्हाला लागला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सेना-भाजपा सत्ताकाळात १९९६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी, दोन वर्षात विदर्भाचा विकास झाला नाही तर, आपण स्वत:हून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र अखंड महाराष्ट्र म्हणणाऱ्या त्यांच्या चिरंजिवांना हे कधीच आठवले नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. केवळ सिंचनाच्या संदर्भात अनुशेष सरकारने लक्षात घेतला. तरीही विदर्भाची दिशाभूलच झाली. विदर्भाची १८० धरणे कागदावरच राहिली. २०१३ मध्ये केळकर समितीचा अहवाल आला. हा अहवाल अद्याप सरकारच्या टेबलवरच असला तरी, विदर्भातील सिंचनाचा अनुशेष संपल्याचे सांगून या अहवालाने धमालच केली आहे. विदर्भात फक्त ४० टक्के जमीन सिंचनाखाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०२ टक्के सिंचन झाले आहे. विदर्भाचाच पैसा तिकडे वळविला, असा आरोपही त्यांनी केला.अध्यक्षीय भाषणातून अ‍ॅड. रविंद्र भागवत यांनी विदर्भाबाबतच्या उदासिन मानसिकतेवर प्रकाश टाकून व्याख्यानानंतर यावर विचार करण्याचे आवाहन श्रोत्यांना केले. प्रस्ताविकातून डॉ. अशोक जिवतोडे यांनी आयोजनामागील भूमिका विषद केली. (जिल्हा प्रतिनिधी)