शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

शिक्षणावरून सत्ताधारी व विरोधकात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:39 IST

जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली.

जिल्हा परिषदेची सभा : अनेक प्रश्नांवर मोघम उत्तरे दिल्याचा विरोधकांचा आरोपचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली. या सभेत शिक्षण विभागाशी निगडीत अनेक प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली. सत्ताधारी मोघम, चुकीचे उत्तरे देऊन विषय पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. अधिकारीही सदस्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती सादर करीत होते, असा आरोप विरोधक करीत होते. त्यामुळे सभेत चांगलाच गोंधळ उडाला. सत्ताधारी गटाच्या एका महिला सदस्याने ‘अधिकाऱ्यांवर तुमचा वचक नाही’ असे पदाधिकाऱ्यांनाच सुनावल्याने वातावरण आणखीणच तापले.जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी मागील अनेक दिवसांपासून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार केवळ शिक्षण विभागाच्या प्रश्नांवर मंगळवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत सदस्यांना दिलेल्या इतिवृत्तातील माहिती आणि प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती यात मोठी तफावत होती. ही बाब विरोधी सदस्यांच्या निदर्शनास येताच सदस्यांनी आक्षेप नोंदविला. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५८५ शाळा असून, यापैकी १ हजार ९६ शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, क्रीडा विभागाकडून पुरविण्यात आलेल्या साहित्याबाबत प्रशासनाकडे कोणतीही नोंद नसल्याचे आढळून आले. तर ८५८ शाळांमध्ये क्रीडांगण आहेत, तर ७२७ शाळा क्रीडांगणाविना असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, असे असतानाही या शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्यात आले आहे. याची माहितीच शिक्षण विभागाला नसल्याचे सभेत स्पष्ट झाले. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनीही चूक मान्य केली, जिल्ह्यातील १ हजार ५८५ शाळांपैकी केवळ २६ शाळांमध्येच शौचालय नसल्याचे इतिवृत्तात दाखविण्यात आले होते. त्यामुळे जर जंगलालगतच्या शाळांपैकीच ४२ शाळा शौचालयाविना असताना एकूण शाळांपैकी केवळ २६ शाळाच या सुविधेपासून वंचित कशा, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित करून आकडेवारी चुकीची असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३१२ शाळा दाखविण्यात आले आहे. मात्र, त्याची यादी देण्यात आली नाही. संरक्षक भींतीबाबतही चुकीची माहिती देण्यात आली. वरिष्ठ वेतनश्रेणीचेही ७३७ प्रकरणे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असून यावर काय कार्यवाही केल्याचा प्रश्न उपस्थित केला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला.‘लोकमत’च्या वृत्तावर सभागृहात चर्चा‘खिशात पास तरीही, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास’ असे वृत्त व ‘विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला’ या विषयावर सोमवारी ‘लोकमत’ने विशेष पान काढले होते. याबाबत जिल्हा परिषद काँग्रेसचे उपगटनेता खेमराज म्हरस्कोल्हे यांनी सभागृहात ‘लोकमत’ वृत्तपत्र उंचावून प्रश्न उपस्थित केला. तेव्हा अध्यक्षांनी एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. सत्ताधारी गटाच्या महिला सदस्याकडून घरचा अहेरशिक्षण विभागातील ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते, त्या एकाही प्रश्नाची माहिती अचूक देण्यात सत्ताधारी अपयशी ठरले. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी गटाच्या सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती स्तरावर अधिकारी जुमानत नसल्याचा आरोप करीत सावली तालुक्यातील भाजपच्या एका महिला जि.प. सदस्याने पदाधिकाऱ्यांना ‘अधिकाऱ्यांवर तुम्हचा वचक नाही’ असे खडेबोल सुनावले. त्यामुळे वातावरण तापले होते.