शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना डायरिया

By admin | Updated: April 13, 2015 01:52 IST

येथून जवळ असलेल्या कारवा या गावातील माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे डायरियाची

एका विद्यार्थ्याचा मृत्यू : कारवा आश्रमशाळेतील संतापजनक प्रकार, २० विद्यार्थ्यांना लागणबल्लारपूर : येथून जवळ असलेल्या कारवा या गावातील माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाली आहे. एका विद्यार्थ्यांचा डायरियाने शनिवारी सायंकाळला मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्यांचे नाव गणेश रूस्तम शिंदे (१३) असून तो मूळचा सावा जि. हिंगोली येथील होता. तो या आश्रमशाळेत सहाव्या वर्गात शिकत होता. या खेरीज, याच आश्रमशाळेतील सुमारे २० विद्यार्थ्यांना हगवण आणि उलटी अशी डायरियासदृश आजाराची लागण झाल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांना येथील ग्रामीण रुग्णालय व काही खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करून घेतल्याचे समजते.सद्यस्थितीत या शाळेचे संतोष कन्नायासिंग राठोड, मनीष मदन मल्लोजी व मदिरा मदन मल्लोजी हे तीन विद्यार्थी हगवण व उलटी या त्रासाने बाधित असून ग्रामीण रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, मृत गणेश व त्याच्या सोबतचा त्याच आश्रमशाळेतील रामदास पांडुरंग गायकवाड या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती शुक्रवारी रात्रीच बिघडली. शनिवारी सकाळी या दोघांना आश्रमशाळेतील शिक्षकांनी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने रामदासची प्रकृती लवकर सुधारली. परंतु, गणेशच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली नाही. डॉक्टरने त्याला परत एक दिवस उपचारार्थ दाखल राहण्याचा सल्ला दिला. परंतु, आपल्या गावाला जाण्याच्या घाईत त्याने डॉक्टरकडून सुटी मागून घेऊन हिंगोलीला जाणाऱ्या इतर आठ-दहा विद्यार्थ्यांसह तोही बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर गेला. तेथे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने, रुग्णालयात आणत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. आज रविवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा मृत्यू डायरियाने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बल्लारपूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.कारवा येथील या आश्रमशाळेत पेयजल बोअरिंग आहे. ५-६ दिवसांपूर्वी या बोअरिंगमध्ये बिघाड झाल्याने जवळच्याच जुन्या बोअरिंगचे पाणी विद्यार्थ्यांना दिले जाऊ लागले आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना हगवण आणि उलटी होऊ लागली. अशा बाधित विद्यार्थ्यांना खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील बऱ्याच जणांची प्रकृती सुधारली. मात्र यातील तिघेजण अद्यापही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल आहेत. गणेशचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला की इतर कारणाने याचा उलगडा होईलच. डायरियामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अंदाजात दिसून येत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कुंभारे यांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखलया घटनेची माहिती खासदार व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना होताच त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुभाष कुंभारे यांच्याकडे याबाबत विचारणा केली. या शाळेतील बोअरिंग आणि विहिरीतील पाण्याचे नमूने तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार, डॉ. कुंभारे यांनी दुपारी आश्रमशाळेत जाऊन, पाण्याचे नमूने आणले व तपासाकरिता पाठविले आहे.मुख्याध्यापक म्हणतात, पाणी दूषित नाहीया आश्रम शाळेतीतील तीन विद्यार्थी उलटी व हगवणीने बाधित होऊन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गणेश सोबतच्या रामदास गायकवाडने येथील खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतला. व तो बरा झाला. एवढे सारे स्पष्ट असूनही या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक केवळ त्याची प्रकृती बिघडली इतर कुणालाही काही झाले नाही असे सांगत आहेत. खुद्द डॉ. कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी म्हणजे ३-४ दिवसांपूर्वी मलेरिया आणि डायरियाने पीडित विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. त्यात कारवा येथीलही रुग्ण होते. असे असतानाही आम्ही ही तेच पाणी पीत असतो. इतर विद्यार्थीही तेच पाणी पितात. त्यामुळे, पाण्याचा हा दुष्परिणाम असे म्हणता येत नाही, असे मुख्याध्यापक सांगत आहे.प्रकरणाची चौकशी व्हावीकारवा येथील आश्रमशाळेत घडलेली ही घटना संतापजनक व तेवढीच गंभीर आहे. यात एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला आहे. मुख्याध्यापक पाणी दूषित नसल्याचे सांगत असले तरी २० विद्यार्थ्यांना डायरियाची लागण झाली आहे. या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.