शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

पारडगाववासीयांना डायरियाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:47 IST

तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे. एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्दे३० रूग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे.एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.पारडगावची लोकसंख्या दीड हजार आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन टाक्या बनविलेल्या असून एका टाकीत बोअवेलचे तर दुसºया टाकीत भुतीनाल्यातील शुध्द केलेले पाणी सोडले जाते. त्यानंतर सर्व गावाला नळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. परडगावत लागलेली डायरियाची साथ दूषित पाण्यामुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज उपचार करणाºया ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारपासून ही लागण काही नागरिकांना झाली असता या बाबीकडे नागरिकांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु सोमवारी सकाळपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे एकच धावपळ उडाली. सोमवारी सकाळी ११ वाजता चौगान येथील आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाल्यानंतर तपासणीअंती ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी तब्बल ३० रुग्णांना भरती करण्यात आले आहे .पाण्याच्या नमुन्याची तपासणी नाहीपारडगाववासीयांकडून अधिक माहिती घेतली असता प्रशासनाकडून दर महिन्याला तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले जातात. परंतु या महिन्यात पाण्याचे नमुने तपासणी करण्यासाठी घेण्यात आले नसल्याचे तसेच येथील ग्रामपंचायत चपराशी यांचे निधन झाले असल्याने गत दोन महिन्यांपासून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नसल्याचे गावकºयांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मागील सात-आठ वर्षांपासून पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात आली नसून सदर टाकीत बांबू टाकून पाहिले असता त्याठिकाणी बांबू फसतो, असेसुद्धा गावकºयांनी सांगितले.अशा प्रकारची लागण अस्वच्छता, खानपान आणि दूषित पाणी यामुळे होत असून या सर्व रुग्णांना झालेली लागण दूषित पाण्यापासूनच झाली असावी.- भाग्यश्री वºहाडे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी.