शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पारडगाववासीयांना डायरियाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:47 IST

तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे. एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्दे३० रूग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे.एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.पारडगावची लोकसंख्या दीड हजार आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन टाक्या बनविलेल्या असून एका टाकीत बोअवेलचे तर दुसºया टाकीत भुतीनाल्यातील शुध्द केलेले पाणी सोडले जाते. त्यानंतर सर्व गावाला नळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. परडगावत लागलेली डायरियाची साथ दूषित पाण्यामुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज उपचार करणाºया ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारपासून ही लागण काही नागरिकांना झाली असता या बाबीकडे नागरिकांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु सोमवारी सकाळपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे एकच धावपळ उडाली. सोमवारी सकाळी ११ वाजता चौगान येथील आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाल्यानंतर तपासणीअंती ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी तब्बल ३० रुग्णांना भरती करण्यात आले आहे .पाण्याच्या नमुन्याची तपासणी नाहीपारडगाववासीयांकडून अधिक माहिती घेतली असता प्रशासनाकडून दर महिन्याला तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले जातात. परंतु या महिन्यात पाण्याचे नमुने तपासणी करण्यासाठी घेण्यात आले नसल्याचे तसेच येथील ग्रामपंचायत चपराशी यांचे निधन झाले असल्याने गत दोन महिन्यांपासून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नसल्याचे गावकºयांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मागील सात-आठ वर्षांपासून पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात आली नसून सदर टाकीत बांबू टाकून पाहिले असता त्याठिकाणी बांबू फसतो, असेसुद्धा गावकºयांनी सांगितले.अशा प्रकारची लागण अस्वच्छता, खानपान आणि दूषित पाणी यामुळे होत असून या सर्व रुग्णांना झालेली लागण दूषित पाण्यापासूनच झाली असावी.- भाग्यश्री वºहाडे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी.