शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पारडगाववासीयांना डायरियाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:47 IST

तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे. एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्दे३० रूग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे.एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.पारडगावची लोकसंख्या दीड हजार आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन टाक्या बनविलेल्या असून एका टाकीत बोअवेलचे तर दुसºया टाकीत भुतीनाल्यातील शुध्द केलेले पाणी सोडले जाते. त्यानंतर सर्व गावाला नळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. परडगावत लागलेली डायरियाची साथ दूषित पाण्यामुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज उपचार करणाºया ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारपासून ही लागण काही नागरिकांना झाली असता या बाबीकडे नागरिकांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु सोमवारी सकाळपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे एकच धावपळ उडाली. सोमवारी सकाळी ११ वाजता चौगान येथील आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाल्यानंतर तपासणीअंती ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी तब्बल ३० रुग्णांना भरती करण्यात आले आहे .पाण्याच्या नमुन्याची तपासणी नाहीपारडगाववासीयांकडून अधिक माहिती घेतली असता प्रशासनाकडून दर महिन्याला तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले जातात. परंतु या महिन्यात पाण्याचे नमुने तपासणी करण्यासाठी घेण्यात आले नसल्याचे तसेच येथील ग्रामपंचायत चपराशी यांचे निधन झाले असल्याने गत दोन महिन्यांपासून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नसल्याचे गावकºयांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मागील सात-आठ वर्षांपासून पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात आली नसून सदर टाकीत बांबू टाकून पाहिले असता त्याठिकाणी बांबू फसतो, असेसुद्धा गावकºयांनी सांगितले.अशा प्रकारची लागण अस्वच्छता, खानपान आणि दूषित पाणी यामुळे होत असून या सर्व रुग्णांना झालेली लागण दूषित पाण्यापासूनच झाली असावी.- भाग्यश्री वºहाडे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी.