शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

चंद्रपुरात आजपासून धम्मचक्र अनुवर्तन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:50 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला.

ठळक मुद्देदीक्षाभूमी सज्ज : देश-विदेशातील बौद्ध भिक्खूंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या घटनेला उजाळा म्हणून लाखो बौद्ध बांधव दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. ही आठवण सतत व्हावी म्हणून येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६१ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजतापासून धम्मध्वजारोहण करून तथागत बुद्धाच्या धम्माचा जागर केला जाणार आहे. यासाठी देश-विदेशातील बौद्ध भिक्खूंची उपस्थिती राहणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला रविवारी सायंकाळी ५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शांती मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, भदंत डॉ. वण्णासामी (अरुणाचल प्रदेश), मनपाचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांची उपस्थिती राहणार आहेत.१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह समता सैनिक दलाच्या पथसंचलनाची लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. यावेळी प्रमुख सोहळ्याला पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित राहणार आहेत.पुस्तकांच्या स्टॉलवरही दिसणार निळाईडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लेखनाच्या माध्यमातून मुक समाजात वेदनेचा हुंकार भरला. आजघडीला दलित साहित्य चळवळीचा आत्मा ठरले आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर येणारा आंबेडकरांचा अनुयायी मानवतेचा संदेश देणारे एकतरी पुस्तक घेतो. यासाठी पुुस्तकांच्या स्टॉलची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते. कोठेही उपलब्ध न होणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध आणि अन्य पुरोगामी विचाराचे साहित्य दीक्षाभूमीवर सहज मिळते. यामुळे पुस्तकांच्या स्टॉलवरही भीम निळाई अवतरणार आहे. पुस्तकासोबतच मूर्ती आणि भीम बुद्ध गीताच्या माध्यमातून क्रांतीचा संदेश देणाºया सीडीचे स्टॉल लागले असते.सामाजिक बांधिलकीतून केले जाते भोजनदानयेथील धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील आंबेडकर अनुयायी येथील दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. ही संख्या लाखोंवर असते. दीक्षाभूमीवर येणारा बांधव उपाशी राहू नये म्हणून शहरातील विविध सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, नगरसेवक, कर्मचारी संघटना भोजनदान करतात. यामुळे सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व प्रकारची सोय दीक्षाभूमी परिसरात करण्यात आलेली असते.