शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

चंद्रपुरात आजपासून धम्मचक्र अनुवर्तन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:50 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला.

ठळक मुद्देदीक्षाभूमी सज्ज : देश-विदेशातील बौद्ध भिक्खूंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या घटनेला उजाळा म्हणून लाखो बौद्ध बांधव दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. ही आठवण सतत व्हावी म्हणून येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६१ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजतापासून धम्मध्वजारोहण करून तथागत बुद्धाच्या धम्माचा जागर केला जाणार आहे. यासाठी देश-विदेशातील बौद्ध भिक्खूंची उपस्थिती राहणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला रविवारी सायंकाळी ५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शांती मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, भदंत डॉ. वण्णासामी (अरुणाचल प्रदेश), मनपाचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांची उपस्थिती राहणार आहेत.१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह समता सैनिक दलाच्या पथसंचलनाची लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. यावेळी प्रमुख सोहळ्याला पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित राहणार आहेत.पुस्तकांच्या स्टॉलवरही दिसणार निळाईडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लेखनाच्या माध्यमातून मुक समाजात वेदनेचा हुंकार भरला. आजघडीला दलित साहित्य चळवळीचा आत्मा ठरले आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर येणारा आंबेडकरांचा अनुयायी मानवतेचा संदेश देणारे एकतरी पुस्तक घेतो. यासाठी पुुस्तकांच्या स्टॉलची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते. कोठेही उपलब्ध न होणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध आणि अन्य पुरोगामी विचाराचे साहित्य दीक्षाभूमीवर सहज मिळते. यामुळे पुस्तकांच्या स्टॉलवरही भीम निळाई अवतरणार आहे. पुस्तकासोबतच मूर्ती आणि भीम बुद्ध गीताच्या माध्यमातून क्रांतीचा संदेश देणाºया सीडीचे स्टॉल लागले असते.सामाजिक बांधिलकीतून केले जाते भोजनदानयेथील धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील आंबेडकर अनुयायी येथील दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. ही संख्या लाखोंवर असते. दीक्षाभूमीवर येणारा बांधव उपाशी राहू नये म्हणून शहरातील विविध सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, नगरसेवक, कर्मचारी संघटना भोजनदान करतात. यामुळे सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व प्रकारची सोय दीक्षाभूमी परिसरात करण्यात आलेली असते.