शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

दिव्यांग मंजिरीच्या मेंदीभरल्या स्वप्नांना नक्षत्रांचे आंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:57 IST

हल्लीच्या प्रेम कहाण्या म्हणजे दोघांची नजरानजर, मग भेटीगाठी. थोडा कौटुंबिक विरोध आणि सरते शेवटी लग्न. येथे ती प्रेमकथा संपते.

ठळक मुद्देव्हीलचेअरवरचा अनोखा विवाह : सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी

राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतचिमूर : हल्लीच्या प्रेम कहाण्या म्हणजे दोघांची नजरानजर, मग भेटीगाठी. थोडा कौटुंबिक विरोध आणि सरते शेवटी लग्न. येथे ती प्रेमकथा संपते. पण दिव्यांग मंजिरी व बंसी यांची कवितेच्या माध्यमातून झालेली ओळख आणि मग मोठ्या संघर्षातून झालेला विवाह, समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. नशिबाला चिकटलेल्या व्हीलचेअरच्या बाजुला भक्कमपणे पाय रोवून मंजिरीचा हात हातात घेत बंसीने तिच्या मेंदीभरल्या स्वप्नांना जणू नक्षत्रांचे आंदणच दिले आहे.वर बंसी सर्वच बाबतीत सुदृढ तर वधू मंजिरी दिव्यांग. तिचे संपूर्ण आयुष्यच व्हीलचेअरवरचे. लहाणपणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आलेले या दिव्यांगत्वामुळे तिचे आयुष्यच पालटले. पण तिची जगण्याची उमेद वाखाणण्यासारखी. ती कविता करायची. कथा लिहायची. तिच्या कविता, कथा अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या. ती विविध विषयांवर लिहायची. आपल्या दिव्यंगत्वावर मात करुन ती नवे क्षितिजे शोधू लागली. तिने साहित्याला जवळ केले. ती नवनवे लेखन करु लागली. अशातच तिच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या कविता चित्रकार व संवेदनशील मनाचा कवी बंसी कोठेवार यांनी वाचल्या. वृत्तपत्रांतील कविता वाचून अभिप्राय देणे, बोलणे सुरु झाले. मैत्री झाली. बंसी अवलिया माणूस. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) येथे वास्तव्यास असलेल्या बंसीने आतापर्यंत शेकडो चित्रे काढली. अनेक दिवाळी अंक, वृत्तपत्रात, साप्ताहिक-मासिकांत ती प्रकाशित झाली. अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ बंसीने आपल्या कुंचल्यातून सजवले. त्यांची चित्रे बघणाºयांना भूरळ पाडणारी. नखचित्रे हाही प्रकार त्यांनी अतिशय उत्कृष्ठपणे हाताळलेला. ग्रामीण भागात राहून कलेची उपासना करणारा हा अवलिया साहित्यक्षेत्रात भरारी घेऊ पाहणाºया मंजिरी भोयर हिच्या जीवनात आला.दोघांची मैत्री फुलत गेली. २०१४ मध्ये ‘दहा बाय दहा’ हा मंजिरीचा काव्यसंग्रह आला. तिला लेखनाची नवी प्रेरणा मिळत होती. साहित्यक्षेत्रात तिचे नाव होऊ लागले. अनेक पुरस्कार तिला या काव्यसंग्रहासाठी मिळाले. अशातच एके दिवशी बंसीने मंजिरीच्या वडिलांना तिच्या लग्नाची मागणी घातली. आपली मुलगी अशी, आयुष्यभर चालू न शकणारी. तिला सर्व बाबतीत सुदृढ असलेल्या व्यक्तीने केलेली मागणी हा वेडेपणा आहे, असे म्हणत मंजिरीच्या वडिलांनी बंसीला स्पष्ट नकार दिला.पण आता बंसी आणि मंजिरी यांची ही अनोखी प्रेमकथा आकार घेऊ लागली होती. तिच्यातील प्रतिभेला नवा आयाम देण्यासाठी लग्न करणार तर मंजिरीशीच; अन्यथा नाही, असा ठाम निश्चय बंसीने केला होता. या त्याच्या निर्णयाला त्याच्या कुटुंबीयांनी सहकार्य केले.मंजिरीच्या कुटुंबीयांची समजूत घालण्याचे काम सुधीर गायकी यांनी केले. आणि ही अनोखी प्रेमकथा चार-पाच वर्षांनंतर ७ फेब्रुवारीला हिंगणघाट जि.वर्धा येथे विवाहबंधनाच्या पवित्र धाग्यात बांधल्या गेली. बंसीचा हा निर्णय आणि त्याचे फलित हा प्रचंड इच्छाशक्तीचा जणू विजयच होता.