शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

विकासकामांना गती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST

कामगारांची चिंता वाढली चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून विविध खासगी क्षेत्रात काम करूनही अत्यल्प पेन्शन मिळत असल्यामुळे ...

कामगारांची चिंता वाढली

चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून विविध खासगी क्षेत्रात काम करूनही अत्यल्प पेन्शन मिळत असल्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या कामागारांनी उपस्थित केला आहे.

अतिक्रमण हटविण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिकेने अतक्रिमण हटाव मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करावी

ब्रह्मपुरी : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन काळामध्ये रस्त्याचे कामे बंद होती. आता काही ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, गती नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

निवाऱ्याची दुरवस्था

चंद्रपूर : चंद्रपूर-आदिलाबाद महामार्गावरील रस्त्यावर प्रवासी निवाऱ्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडांचा आश्रम घ्यावा लागत आहे. या प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन द्या

चंद्रपूर : शासनाने विविध विभागामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, त्यांना मानधन कमी दिले जात असल्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला आहे. या कामगारांना मानधन वाढवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास

चंद्रपूर : शहरातील विविध भागासह जमनजेट्टी परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने या मार्गावरील पथदिवे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये संताप

चंद्रपूर : येथील तुळशीनगरात ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्रासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे नगरसेवकांनी लक्ष देऊन विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यावरील झुडपे जीवघेणी

कोरपना: ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे झुडपे तोडून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वन्यप्राण्यांमुळे अपघाताची शक्यताही आहे.

रिक्त पदांमुळे कामे खोळंबली

जिवती : येथील तहसील कार्यालयात काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात, परंतु कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे खोळंबली आहेत. रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.