शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

नियोजनशून्यतेमुळे रखडला पकडीगुडमचा विकास

By admin | Updated: November 15, 2014 01:30 IST

शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरलेला पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प नियोजनशुन्यता व प्रशासकीय अनास्थेमुळे कुचकामी ठरला आहे.

वनसडी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरलेला पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प नियोजनशुन्यता व प्रशासकीय अनास्थेमुळे कुचकामी ठरला आहे. उद्योगाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने प्रकल्पाच्या हेतुलाच हरताळ फासला जात आहे. या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्याच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे येथील विकास रखडला आहे.सद्या रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून शेतात गहू, ज्वारी, हरभरा तसेच कपाशीचे पीक आहे. दरवर्षी सदर धरणातून कालव्याद्वारे पाणी शेतापर्यंत पोहचविले जाते. यासाठी कालव्यांची स्वच्छता सिंचन विभाग करीत असते. मात्र येथील दोन्ही कालवे अद्यापही स्वच्छ करण्यात आले नाहीत. कालव्यात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने पाण्याचा पुरवठा होईल की नाही, याबाबत सांशकताच आहे. काही ठिकाणी तर कालवा कोरडा पडल्याचे दिसून येते. कागदोपत्री कालवे स्वच्छ झाले असल्याचे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. येथील प्रकल्पाचे कार्यालय गडचांदूरला असल्याने तेथून कारभार सुरू आहे. तालुक्यातील अमलनाला सिंचन प्रकल्प व या प्रकल्पाची धुरा एकाच शाखा अभियंत्याावर आहे. अमलनाला धरणासोबतच पकडीगुडमचीही प्रभारी धुरा सांभाळत असल्याने प्रकल्पाकडे पाहिजे तेवढे लक्ष देणे शक्य होत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन कालव्याच्या पाण्याद्वारे होते. परंतु शेतात पीक वाढत असताना मात्र कालव्याद्वारे पाणी उपलब्ध होत नसल्याने पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी सिंचन विभाग नियमित पाणीपुरवठा करीत असताना शेतकऱ्यांना मात्र सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आसहे. यापूर्वी या प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी कोट्यवधी खर्च करण्यात आला. परंतु हजारो हेक्टरवरील शेतपिके सिंचनापासून वंचित आहे, हे वास्तव आहे. या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रकल्प निर्मितीनंतरही अनेक वर्षे लोटूनही याठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. कालव्यांनाही खड्डे पडले असल्याने पाणी वाया जात आहे. (वार्ताहर)