शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

बल्लारपूरसाठी सव्वाशे कोटींची विकास योजना

By admin | Updated: November 6, 2014 22:53 IST

निवडणुकीत आम्ही जनतेला जी आश्वासन देतो, ती पूर्ण करतो. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे आमचं ब्रिदवाक्य आहे. आमच्या पक्षाची सत्ता आल्यास बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करू,

बल्लारपूर : निवडणुकीत आम्ही जनतेला जी आश्वासन देतो, ती पूर्ण करतो. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे आमचं ब्रिदवाक्य आहे. आमच्या पक्षाची सत्ता आल्यास बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन येथील जनतेला दिले होते. सव्वाशे कोटी रुपये बल्लारपूरच्या विविध विकास कार्याला लावून ते आश्वासन नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील जनतेला मंगळवारी दिली. ना. मुनगंटीवार यांचे येथे स्वागत करण्यात आले. स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या स्वागत समारंभात ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले, मुनगंटीवार यांच्या सहधर्मचारिणी सपना मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हरिष शर्मा, शहर अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, महिला आघाडीच्या रेणूका दुधे, रामधन सोमानी, जगदीश गहेरवार, प्रमोद कडू, समीर केने, निलेश खरवडे, अशोक गुप्ता, देवनारायण चौहान इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. हार घालून मुनगंटीवार यांचे स्वागत करण्यात आले. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात बल्लारपूर तालुक्यातील समस्यांसोबतच, दारुबंदी, स्वतंत्र विदर्भ, टोलनाका, औद्योगिक प्रश्न, पर्यावरण या विषयावरही भरभरुन बोलले. या साऱ्या समस्या प्राधान्यक्रमाने आम्ही नक्कीच सोडवू, त्याला थोडा अवधी लागेल. तोपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून धीर धरा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला. आघाडी सरकारने पैशाची वारेमाप उधळपट्टी करुन राज्याची तिजोरी रिकामी केली. आम्हाला काटकसर करुन ती तिजोरी भरावयाची आहे. येथील मतदारांनी मला आमदार बनविले. मुख्यमंत्र्यांनी मंत्री बनवून माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. राज्याच्या तिजोरीची चाबी सांभाळत सहकारी मंत्री व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने राज्याचा विकास करायचा आहे. कामगारांवर अन्याय होऊ नये, अशी औद्योगिक ध्येय धोरण ठरवून ती राबवायची आहेत. राज्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, ग्रामीण भागाचाही विकास साधायचा आहे, असे शेवटी ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)