शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

By admin | Updated: March 6, 2016 00:32 IST

फेब्रुवारी महिन्यात सतत तीन दिवस आणि शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अवकाळी पाऊस : शासनाकडून नुकसानभरपाईची अपेक्षाचंद्रपूर : फेब्रुवारी महिन्यात सतत तीन दिवस आणि शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच गारपीट आणि वादळही सुटले. परिणामी हातात येणारा रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या अवकाळी पावसाचा जवळजवळ सर्वच तालुक्यात थोडाअधिक फटका बसून हजारो हेक्टरवरील रबी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ५० ते ६० टक्के उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. लागवड खर्चही न निघाल्याने शेतकरी यंदा कर्जफेड करू शकला नाही. अशातच शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसऱ्यांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, मूग, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. मागील वर्षी जिल्ह्यात एक लाख १५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना रबीतून उत्पादनही बऱ्यापैकी झाले होते. यावर्षीदेखील एक लाखांहून अधिक हेक्टरवर रबीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. रबी हंगामात सर्वाधिक पेरणी वरोरा उपविभागात होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यांचा समावेश आहे. या उपविभागात ५२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रबी पीक पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. मात्र कृषी विभागाचे हे नियोजन शेतकऱ्यांनी फोल ठरविले. यावर्षी रबीत मागील वर्षीच्या तुलने निम्म्यावरही पिकांची पेरणी झाली नाही. जिल्ह्यात केवळ ६५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली. यंदा पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊसच झाला नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती होती. ती खरीही ठरली. रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागली. मोठ्या आशेने आणि हिंमतीने पिकांची जोपासणा करीत शेतकऱ्यांनी कसेबसे पिक पिकविले. त्यातही यंदा हिवाळा सुरू होऊनही थंडी पडली नाही. अगदी शेवटी जानेवारी महिन्यात थोडीफार थंडी पडली. मात्र तेही काही दिवसात लोपली. त्यामुळे गहू, हरभरा या पिकांची वाढच खुंटली. आता शेतकऱ्यांच्या हातात रबी पिके येऊ लागली आहेत. काही शेतकऱ्यांनी गहू, लाखोळी तोडून शेतातच वाळू टाकली होती. मात्र मध्येच फेब्रुवारी महिन्यात आणि आता काल अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काल शुक्रवारी विजांचा कडकडाटासह वादळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, जिवती, मूल, सावली, चंद्रपूर, कोरपना, बल्लारपूर, नागभीड तालुक्यात वादळासह पाऊस बरसला. तर भद्रावती, ब्रह्मपुरी तालुक्यात ढगाळ वातावरण व वादळ सुटले होते. या पावसामुळे पुन्हा रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. कृषी किंवा महसूल विभागाने अद्याप सर्वेक्षण केले नसले तरी हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)तत्काळ सर्वेक्षण व्हावेजिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रबी पिकांचे नुकसान झाले. काही पिके कापून शेतातच ढिग करून असल्याने तेदेखील पाण्यामुळे खराब झाले. शेतकऱ्यांच्या आमराईतील मोहरही वादळामुळे झडला. या नुकसानीचे कृषी किंवा महसूल विभागाने तत्काळ सर्वेक्षण करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.