शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:11 IST

बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

ठळक मुद्देअनिर्बंध वापरावर अंकुश नाही, जनजागृती करण्याची गरजच

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी : राज्यात प्लास्टिक बंदी केल्यानंतरही भद्रावती शहरामध्ये काही दुकानदारांकडून लपून-छपून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. यामुळे पर्यावरण संतुलन धोक्यात आले आहे. युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे नागरिकांकडून प्लास्टिकचा होणारा अनिर्बंध वापर, शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याचेच द्योतक आहे. त्यामुळे लपूनछपून का, असेना प्लास्टिकचा वापर बोकाळलेला आहे.शासनाने एक नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासकीय यंत्रणेकडून प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी पुढे येत आहे.पानठेल्यांवरील खर्रा पन्न्या व प्लास्टिक पिशव्या वजनाने हलक्या असल्याने हवेबरोबर वाहत जाऊन जमिनीवर पसरतात आणि गुरे त्यांना चारा समजून खातात. त्यांच्या गळ्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे कोंबून पाणी साचते. गटारे निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिक जमीन, पाणी व अन्नसाखळी दूषित करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हाणीकारक बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.जनावरांना धोकाशहरातील कानाकोपऱ्यात वसलेल्या अनेक पानठेल्यांवर खर्रा बांधून देण्यासाठी प्लास्टिक पन्नीचा वापर केला जातो. ग्राहक खर्रा खाऊन झाल्यावर प्लास्टिक पन्नी तशीच रस्त्यावर फेकून देतात. ती उडत रस्त्यावर आल्याने शहराच्या सौंदर्यात बाधा पडत आहे. भद्रावती पर्यटन नगरी असल्याने एकीकडे पालिका स्वच्छतेबाबत प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रस्त्यावरील या पन्न्या शहराच्या सौंदर्यात बाधा आणत आहे. त्यातही प्लास्टि पिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्या इतरत्र पडलेल्या दिसून येतात. बहुतेक जनावरे त्या चार म्हणून खातात. त्यामुळे जनावरांना धोका होण्याची शक्यता आहे. सद्या जनावरांच्या चाऱ्यांची मोठ्या प्रमाणात टंचाई सुरु आहे. परिणामी जनावरे शहरात मोकाट फिरताना आढळून येतात. त्यामुळे शहरात आढळलेल्या पिशव्यांचे सेवन करतात आहेत. त्यामुळे जनावरांना धोका होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसून येत आहे.कागदी पिशव्यांचा वापर करावासाहित्य खरेदी केल्यानंतर त्याचे वहन करण्यासाठी बाजारात कागदी पिशव्याही उपलब्ध आहेत. मात्र बहुतेक दुकानदार व व्यावसायिक केवळ प्लास्टिक पिशव्याच वापर करीत आहेत. कागदी पिशव्या या पर्यावरण पुरक आहेत. मात्र प्लास्टिक पिशव्याने पर्यावरणाला हाणी पोहचते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचाच वापर सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृती करुन नागरिकांना कागदी पिशव्यांचा वापर करण्यास जागृत करावे.

टॅग्स :environmentपर्यावरण