शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:11 IST

बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

ठळक मुद्देअनिर्बंध वापरावर अंकुश नाही, जनजागृती करण्याची गरजच

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी : राज्यात प्लास्टिक बंदी केल्यानंतरही भद्रावती शहरामध्ये काही दुकानदारांकडून लपून-छपून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. यामुळे पर्यावरण संतुलन धोक्यात आले आहे. युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे नागरिकांकडून प्लास्टिकचा होणारा अनिर्बंध वापर, शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याचेच द्योतक आहे. त्यामुळे लपूनछपून का, असेना प्लास्टिकचा वापर बोकाळलेला आहे.शासनाने एक नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासकीय यंत्रणेकडून प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी पुढे येत आहे.पानठेल्यांवरील खर्रा पन्न्या व प्लास्टिक पिशव्या वजनाने हलक्या असल्याने हवेबरोबर वाहत जाऊन जमिनीवर पसरतात आणि गुरे त्यांना चारा समजून खातात. त्यांच्या गळ्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे कोंबून पाणी साचते. गटारे निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिक जमीन, पाणी व अन्नसाखळी दूषित करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हाणीकारक बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.जनावरांना धोकाशहरातील कानाकोपऱ्यात वसलेल्या अनेक पानठेल्यांवर खर्रा बांधून देण्यासाठी प्लास्टिक पन्नीचा वापर केला जातो. ग्राहक खर्रा खाऊन झाल्यावर प्लास्टिक पन्नी तशीच रस्त्यावर फेकून देतात. ती उडत रस्त्यावर आल्याने शहराच्या सौंदर्यात बाधा पडत आहे. भद्रावती पर्यटन नगरी असल्याने एकीकडे पालिका स्वच्छतेबाबत प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रस्त्यावरील या पन्न्या शहराच्या सौंदर्यात बाधा आणत आहे. त्यातही प्लास्टि पिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्या इतरत्र पडलेल्या दिसून येतात. बहुतेक जनावरे त्या चार म्हणून खातात. त्यामुळे जनावरांना धोका होण्याची शक्यता आहे. सद्या जनावरांच्या चाऱ्यांची मोठ्या प्रमाणात टंचाई सुरु आहे. परिणामी जनावरे शहरात मोकाट फिरताना आढळून येतात. त्यामुळे शहरात आढळलेल्या पिशव्यांचे सेवन करतात आहेत. त्यामुळे जनावरांना धोका होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसून येत आहे.कागदी पिशव्यांचा वापर करावासाहित्य खरेदी केल्यानंतर त्याचे वहन करण्यासाठी बाजारात कागदी पिशव्याही उपलब्ध आहेत. मात्र बहुतेक दुकानदार व व्यावसायिक केवळ प्लास्टिक पिशव्याच वापर करीत आहेत. कागदी पिशव्या या पर्यावरण पुरक आहेत. मात्र प्लास्टिक पिशव्याने पर्यावरणाला हाणी पोहचते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचाच वापर सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृती करुन नागरिकांना कागदी पिशव्यांचा वापर करण्यास जागृत करावे.

टॅग्स :environmentपर्यावरण