शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:11 IST

बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

ठळक मुद्देअनिर्बंध वापरावर अंकुश नाही, जनजागृती करण्याची गरजच

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी : राज्यात प्लास्टिक बंदी केल्यानंतरही भद्रावती शहरामध्ये काही दुकानदारांकडून लपून-छपून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. यामुळे पर्यावरण संतुलन धोक्यात आले आहे. युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे नागरिकांकडून प्लास्टिकचा होणारा अनिर्बंध वापर, शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याचेच द्योतक आहे. त्यामुळे लपूनछपून का, असेना प्लास्टिकचा वापर बोकाळलेला आहे.शासनाने एक नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासकीय यंत्रणेकडून प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी पुढे येत आहे.पानठेल्यांवरील खर्रा पन्न्या व प्लास्टिक पिशव्या वजनाने हलक्या असल्याने हवेबरोबर वाहत जाऊन जमिनीवर पसरतात आणि गुरे त्यांना चारा समजून खातात. त्यांच्या गळ्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे कोंबून पाणी साचते. गटारे निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिक जमीन, पाणी व अन्नसाखळी दूषित करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हाणीकारक बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.जनावरांना धोकाशहरातील कानाकोपऱ्यात वसलेल्या अनेक पानठेल्यांवर खर्रा बांधून देण्यासाठी प्लास्टिक पन्नीचा वापर केला जातो. ग्राहक खर्रा खाऊन झाल्यावर प्लास्टिक पन्नी तशीच रस्त्यावर फेकून देतात. ती उडत रस्त्यावर आल्याने शहराच्या सौंदर्यात बाधा पडत आहे. भद्रावती पर्यटन नगरी असल्याने एकीकडे पालिका स्वच्छतेबाबत प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रस्त्यावरील या पन्न्या शहराच्या सौंदर्यात बाधा आणत आहे. त्यातही प्लास्टि पिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्या इतरत्र पडलेल्या दिसून येतात. बहुतेक जनावरे त्या चार म्हणून खातात. त्यामुळे जनावरांना धोका होण्याची शक्यता आहे. सद्या जनावरांच्या चाऱ्यांची मोठ्या प्रमाणात टंचाई सुरु आहे. परिणामी जनावरे शहरात मोकाट फिरताना आढळून येतात. त्यामुळे शहरात आढळलेल्या पिशव्यांचे सेवन करतात आहेत. त्यामुळे जनावरांना धोका होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसून येत आहे.कागदी पिशव्यांचा वापर करावासाहित्य खरेदी केल्यानंतर त्याचे वहन करण्यासाठी बाजारात कागदी पिशव्याही उपलब्ध आहेत. मात्र बहुतेक दुकानदार व व्यावसायिक केवळ प्लास्टिक पिशव्याच वापर करीत आहेत. कागदी पिशव्या या पर्यावरण पुरक आहेत. मात्र प्लास्टिक पिशव्याने पर्यावरणाला हाणी पोहचते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचाच वापर सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृती करुन नागरिकांना कागदी पिशव्यांचा वापर करण्यास जागृत करावे.

टॅग्स :environmentपर्यावरण