शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

निकिताने केली प्रतिकूलतेवर मात

By admin | Updated: June 9, 2015 01:33 IST

घरी अठराविश्व दारिद्र्य, वडील मजुरीचे काम करतात, आईही घरकाम करणारी; आईवडीलांचे शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंतचे.

दहावीत मिळविले ९२ टक्के मार्क : कोणत्याही विषयाची नव्हती शिकवणीअनेकश्वर मेश्राम ल्ल बल्लारपूरघरी अठराविश्व दारिद्र्य, वडील मजुरीचे काम करतात, आईही घरकाम करणारी; आईवडीलांचे शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंतचे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता केवळ जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने ती दहावीच्या परिक्षेला सामोरे गेली. सोमवारला लागलेल्या दहावीच्या निकालात निकीता कवडू लभाने हिने ९२.२० टक्के मार्क मिळवून भरारी घेतली. तिने प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता सर्वच विषयात प्रावीण्य मिळविले.बल्लारपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात ती कुटुंबासोबत राहत असून दिलासाग्राम कॉन्व्हेंटची निकीता ही पाचव्या वर्गापासून विद्यार्थीनी आहे. कवडू लभाने यांच्या कुटुंबात पत्नी निलिमा, मोठी मुलगी निकीता व तिचा लहान भाऊ असे चौघांचे मर्यादित कुटुंब आहे. निकिताचे प्राथमिक शिक्षण नगर पालिकेच्या शाळेतच झाले. शैक्षणिक सत्रा दरम्यान निकीताही वर्गात नेहमी पहिल्या दहा विद्यार्थ्यांत असायची. दहावीच्या परिक्षेच्या निकालातही ती दिलासाग्राम कॉन्व्हेंटमध्ये पहिल्या दहा विद्यार्थ्यात तिचा समावेश आहे. तिने दहावीच्या परिक्षेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला बाजुला सारुन यश संपादन केले. तिला इंग्रजी विषयात १०० पैकी ८४, मराठी १०० पैकी ९१, हिंदी १०० पैकी ९१, गणित १०० पैकी ९८, विज्ञान १०० पैकी ९५ तर सामान्य विज्ञान विषयात १०० पैकी ८६ गुण मिळविले आहे. निकीताची भरारी सर्वसामान्यांना प्रेरणा देणारी आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई निलिमा, वडील कवडू व दिलासाग्राम कॉन्व्हेंटच्या शिक्षकवृंद व मुख्याध्यापकांना दिले.वडिलांनी केली होती प्रवेशासाठी विनंती...बल्लारपूर शहरातील दिलासाग्राम कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आटापिटा करावा लागतो. माझ्या मुलीला प्रवेश द्या, म्हणून वडील कवडू यांनी व्यवस्थापनाला चक्क विनंती केली होती. येथे कवडुजी परिस्थितीआड येत होती. मात्र व्यवस्थापनाने निकीताच्या पाचवीतील प्रवेशासाठी तोडगा काढला. प्रवेश परिक्षेत यशस्वी झाल्यास निकीताचा पुढचा शैक्षणिक प्रवास सुरू होणार होता. त्याचवेळी दिलासाग्राम कॉन्व्हेंटच्या व्यवस्थापनाने तिची लेखी परीक्षा घेतली. प्रवेश परिक्षेत निकीताने १०० पैकी ८० मार्क प्राप्त करून कुशाग्रबुद्धीची जाणीव करून दिली. सर्वसामान्य घरच्या विद्यार्थ्यानीला संघर्षमय परिस्थितीची जाणीव त्याच वेळ झाली होती.दृढ निश्चयातून गाठले यशदिलासाग्राम कॉन्व्हेंट मधील निकीताचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. शिक्षणाच्या आड परिस्थिती येऊ द्यायची नाही, असा दृढ निश्चिय करुन शाळेत शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावर तिने भर दिला. वडिलांच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या निकिताने दहावीत सुद्धा कोणत्याही विषयाची शिकवणी लावली नाही. तिचे वडील कवडू हे घरोघरी जाऊन इलेक्ट्रीक फिटींगचे कामे करतात. त्याच भरोशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यामुळे शिकवणी वर्गासाठी पैसा कसा देणार याची पुरेपुर कल्पना निकीताला होती.