शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

नोकरभरती बंदीने बेरोजगारांमध्ये नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST

कोसा उत्पादकांना अनुदानावर शिडी द्यावी चंद्रपूर : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा उत्पादनावर भर आहे. सावली, मूल, चिमूर, सिंदेवाही तालुक्यात ...

कोसा उत्पादकांना अनुदानावर शिडी द्यावी

चंद्रपूर : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा उत्पादनावर भर आहे. सावली, मूल, चिमूर, सिंदेवाही तालुक्यात कोसा उत्पादन घेतले जाते. झाडावरून कोसा तोडण्यासाठी लोखंडी शिडी शासनाने सदर उत्पादकांना द्यावी, अशी मागणी कोसा उत्पादकांनी केली आहे. चिमूर तालुक्यात मोटेगाव, काजळसर, सिंदेवाही-सावली तालुक्यात पेंढरी व पाथरी भागात भोई-ढिवर समाजाचे गरीब कुटुंबे कोसा उत्पादन घेतात.

शेकडो शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा

राजुरा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली; परंतु बोंडअळीने शेतकऱ्यांना लागवडीचाही खर्च मिळाला नाही. आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण केले; पण शेकडो शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही.

अवैध वाहतुकीला आळा घालावा

भद्रावती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसांतच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

बल्लारपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण आहेत. रात्री घराबाहेर निघणेही कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला. शहरात अनेक नागरिक श्वानांचे पालन करतात. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक लस देणे सक्तीचे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नाली उपसा न झाल्याने डासांचा उच्छाद

वरोरा : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन नाल्याचा उपसा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सिग्नल बंदमुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : शहरातील जनता कॉलेज चौकातील वाहतूक दिवे बंद राहत असल्याने वाहने सुसाट वेगाने दामटली जातात. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. चौकात पोलीस तैनात असतात. मात्र, दुपारी अचानक सिग्नल बंद होत असल्याने अपघाताचा धोका आहे.

वर्दळीच्या चौकात गतिरोधक तयार करा

ब्रह्मपुरी : शहरात दररोज सकाळी वडसा मार्गावरील झांशी राणी चौकात वाहनांची वर्दळ असते. हा अतिशय संवेदनशील चौक असल्याने दररोज किरकोळ अपघात होतच असतात. त्यामुळे बांधकाम विभागाने गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर

गोंडपिपरी : येथील वर्दळीच्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले होते. काहींनी स्वत: अतिक्रमण हटविले. मात्र, अनेकांचे अतिक्रमण जैसे-थे आहे. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नगरपंचायतने ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रिक्त पदांमुळे विकास योजना कागदावरच

सिंदेवाही : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्याही विविध योजना आहेत. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही, असा आरोप शेतकरी करीत आहेत.