शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

डेंग्यू पसरविण्यास विभागच जबाबदार

By admin | Updated: June 5, 2014 23:55 IST

जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची साथ असताना या गंभीर प्रकाराकडे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकार्‍यांनी विशेषत: जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुर्लक्ष केल्यामुळे

चौकशीची मागणी : हंसराज अहीर यांचा आरोपचंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची साथ असताना या गंभीर प्रकाराकडे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकार्‍यांनी विशेषत: जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुर्लक्ष केल्यामुळे डेंग्यूच्या  रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांवर प्रभावी व वेळेवर उपचार न झाल्याने गोंडपिंपरी तालुक्यातील चार ते पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली. त्यामुळे या घटनेस जबाबदार असणार्‍या आरोग्य अधिकार्‍यांवर दोषारोप ठेवून कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार हंसराज अहीर यांनी केली आहे. डेंग्यूची मोठय़ा प्रमाणात लागण झालेल्या गोंडपिंपरी तालुक्यातील राळापेठ या गावास ३ जून रोजी भेट देऊन खासदार अहीर यांनी डेंग्यू प्रभावित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची चौकशी केली. यावेळी खासदार अहीर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या अक्षम्य व बेजबाबदार भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करून आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी डेंग्यू व तापाच्या अन्य साथीची त्वरीत दखल घेऊन आरोग्य सुविधा वेळीच उपलब्ध करून दिल्या असत्या तर रुग्णांच्या संख्येत वृद्धी झाली नसती व काही रुग्णांना जीव गमवावा लागला नसता. या सार्‍या प्रकाराला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसुद्धा तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.गोंडपिंपरी तालुक्यात अनेक गावात डेंग्यूची साथ असतानाही स्थानिक उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने या गावात वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी विलंब झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राळापेठ येथे डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जे रुग्ण खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले ते दगावल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. जे रुग्ण दगावले ते कोणत्या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करण्यात आले. या उपचारापोटी या रुग्णांकडून किती बिल आकारण्यात आले व दगावलेले रुग्ण नेमके कोण होते, या सर्व बाबींची चौकशी जिल्हा आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी जबाबदारीने करावी, अशी मागणीही खा. अहीर यांनी केली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील धामणगाव येथे डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू असून या ठिकाणी तातडीने आरोग्य शिबिराची व्यवस्था करून रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करावे, अशा सूचनाही खा. अहीर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. या भेटीप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप करपे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)