शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

इरई पूर संरक्षक भिंतीसाठी हवा पुनर्वसन विभागाचा हिरवा झेंडा; ४९ कोटी ३४ लाखांचा सुधारित प्रस्ताव

By राजेश मडावी | Updated: August 9, 2023 16:03 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर

चंद्रपूर : शहरात वारंवार उद्भवणाऱ्या इरई नदीच्या पूरपरिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पूर संरक्षक भिंत बांधकामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. हा सुधारित प्रस्ताव ४९ कोटी ३४ लाखांचा आहे. मदत व पुनर्वसन विभागाने अंतिम मान्यता दिल्यास प्रश्न मार्गी लागू शकतो.

चंद्रपूरच्या पश्चिमेला वाहणाऱ्या इरई नदीकाठाजवळील परिसरात कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी सखल भागात शिरते. २००६, २०१३ व २०२२ तसेच यंदाही पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेकडो घरांचे नुकसान होऊन वित्तहानी झाली. राज्य शासनानेही पूरसंरक्षण भिंत बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्याबाबतचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. तसा प्रस्तावही तयार करण्यात आला. पडोली पूल ते चौराळा पुलाचे अंतर ७ किमी असून, नदीच्या समांतर डाव्या बाजूला चंद्रपूरची लोकवस्ती आहे. या संपूर्ण लांबीमध्ये पूर संरक्षक भिंतीची अत्यंत आवश्यकता आहे.

प्रस्तावाची सद्यस्थिती

इरई नदी पूरसंरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती, चंद्रपूर यांच्या सभेत शासनातर्फे निर्देश दिल्यानुसार प्राधिकरणाची मान्यता घेण्यात आली. २३ डिसेंबर २०२२ रोजी २४ कोटी ९४ लाख १३ हजार ३७ रुपये या रकमेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात आला. त्यानंतर सुधारित ४९ कोटी ३४ लाख १९ हजार ९०८ रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तो शासनाला सादर करण्यात आला आहे.

''इरई पूरसंरक्षक भिंतीसाठी मदत व पुनर्वसन विभागानेही या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे हिवाळी अधिवेशनादरम्यान केली. जलसंपदा विभागाने सादर केलेल्या इरई नदी पूरसरंक्षक भिंतीच्या बांधकाम प्रस्तावाला तत्काळ मंजुरी प्रदान केल्यास चंद्रपूरकरांची मोठी अडचण दूर होऊ शकते. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे."

- किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरriverनदी