लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात जास्तीत जास्त समृद्ध आणि प्रगतशील शेतकरी निर्माण व्हावे, यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.ते शनिवारी चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. नागभीड येथील नवखळा तर ब्रह्मपुरी येथील सायगाटा येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे व शिवदास कोरे यांच्या पेरू व सेंद्रीय शेतीला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी शेतकºयांशी कृषी संवाद साधला.यावेळी भंडाराचे आ. नरेंद्र भोंडेकर, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही.जी नागदेवते, सहाय्यक गटविकास अधिकारी पुरी, नितीन मते तसेच शेतकरी उपस्थित होते.पेरू शेतीची पाहणीपेरु शेतीची केली पाहणीनागभीड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे यांच्या शेतामध्ये ना. दादाजी भुसे यांनी भेट दिली. तसेच पेरू शेतीची पाहणी केली.प्रगतशील शेतकरी अरुण नरुले, रंजना बांबुळे, सोमेश्वर देव्हारे यांनी शेतीमध्ये राबविलेले नवनवीन प्रयोग तसेच सेंद्रीय शेती याविषयीचे मनोगत व्यक्त केले. जिद्द आणि मेहनतीने प्रयत्न केले तर शेती नक्कीच स्वयंपूर्ण होणार असल्याचे मत यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यक्त केले.
कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST
नागभीड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे यांच्या शेतामध्ये ना. दादाजी भुसे यांनी भेट दिली. तसेच पेरू शेतीची पाहणी केली.प्रगतशील शेतकरी अरुण नरुले, रंजना बांबुळे, सोमेश्वर देव्हारे यांनी शेतीमध्ये राबविलेले नवनवीन प्रयोग तसेच सेंद्रीय शेती याविषयीचे मनोगत व्यक्त केले. जिद्द आणि मेहनतीने प्रयत्न केले तर शेती नक्कीच स्वयंपूर्ण होणार असल्याचे मत यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यक्त केले.
कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी
ठळक मुद्देकृषीमंत्री । थेट बांधावर पोहोचले