शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : नगरपालिका, नगरपंचायतीमधील संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी आणि अनुकंपधारकांच्या प्रलंबित मागण्या अजूनही पूर्ण ...

ठळक मुद्देसमस्या सोडवा : अन्यथा काम बंद आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नगरपालिका, नगरपंचायतीमधील संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी आणि अनुकंपधारकांच्या प्रलंबित मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. यासंदर्भात कर्मचारी-कामगार संघटना संघर्ष समितीमार्फत अनेकदा आंदोलने केली. निवेदने दिली. परंतु मागण्या अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील सर्व न.प. कर्मचाऱ्यांनी आपल्या नगरपालिका, नगरपंचायतीसमोर शनिवारी धरणे आंदोलन करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.चिमूर नगर परिषदेमधील सर्व ८० कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर धरणे दिले. शासनाने विविध मागन्या मान्य न केल्यास २९, ३०, ३१ डिसेंबरला नगर परिषदेमधील सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. याही तीन दिवसात मागण्या मंजूर न झाल्यास १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती नगर परिषद कर्मचारी संघचे अध्यक्ष मिनाज शेख, उपाध्यक्ष हरिचंद्र डांगे यांनी दिली आहे.गोंडपिपरी नगर पंचायतसमोर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणा दिल्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी राऊत यांना दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गोंडपिपरी नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद वनकर, सचिव विनोद वाघाडे, उपाध्यक्ष बंडू झाडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी नगराध्यक्ष सपना साकलवार यांनादेखील निवेदनाची प्रत देण्यात आली. नागभीड येथे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना जिल्हा सचिव मोरेश्वर येरणे, नागभीड नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष परसराम वंजारी, सचिव रितेश येरणे, नंदा गोडे, मीनाक्षी खापर्डे, गजानन समर्थ, गुलाब ठाकरे, उमाकांत बोरकर, विनायक चौधरी, बाळकृष्ण राऊत व इतर कर्मचारी उपस्थित होते.धरणे आंदोलनभद्रावती येथेही एस. एम. पाटील यांच्या नेतृत्वात धरणे दिले. यावेळी न. प. भद्रावतीचे कर्मचारी च. तु. शेडमाके, गुप्ता, गड्डमवार, आशिष घोडे, भुपेश कांबळे, सचिन गाढवे, सुरेंद्र चोचमकर, पि. के. वाणी, एम. जी. धात्रक, पि. एम. उंबरकर, नंदकिशोर केवटे, दीपक मेश्राम, गोविंदा पतरंगे आदी उपस्थित होते.गडचांदुरातही धरणेगडचांदूर : नगर परिषद,नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने येथील नगर परिषद कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा सरकारला इशारा देण्यात आला. यावेळी गडचांदूर नगर परिषद व जिवती नगर पंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते.अशा आहेत मागण्यानगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून विना अटीने सातवा वेतन आयोग लागू करावा, नगरपंचायतीमधील उदघोषणापूर्वीचे सफाई कामगार व कर्मचारी आणि नंतरचे संगणक चालक, पाणीपुरवठा, सफाई विभागातील कर्मचारी कायम करण्यात यावे, समावेशनपूर्वी मयत झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबियांना सेवा निवृत्तीचा लाभ द्यावा, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राम सेवा ग्राह्य धरण्यात यावी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग ३ च्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विधानसभा पटलावर मांडलेल्या सफाई आयोगाच्या अहवालाची तात्काळ अमलबजावणी करावी आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.