शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By admin | Updated: July 24, 2014 23:47 IST

शेतकरी शेतमजूर व बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर : शेतकरी शेतमजूर व बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व स्वराज्य शेतकरी सेवा संघाचे संस्थापक विश्वास कानफाडे, चंद्रपूर - गडचिरोली - वर्धा विभागीय अध्यक्ष मुन्ना तावाडे, विभागीय सचिव उमेश ना. करपे यांनी केले. शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे उपलब्ध करून द्यावी. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, गतवर्षी अतीवृष्टी व पुराची नुकसान भरपाई द्यावी, शेतमालाला भाव द्यावा, कृषी पंपाना तातडीने वीज जोडणी करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, चंद्रपूर जिल्ह्यात धूळखात असलेले लघूसिंचन तातडीने सुरू करावे, बेरोजगार भूमीपूत्रांना खाजगी उद्योगात जिल्ह्यातील नोकर भरती करण्यात यावी. कारखान्यांनीही भूमीपूत्रांनाच बेरोजगाराच्य खाईत लोटल्या जात असल्याची विदारक स्थिती आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम अद्यापही अनेक शेतकरी बांधवाना मिळालेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील अनेक लघुसिंचन प्रकल्प धुळखात आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्चूनही शेतीसाठी सिंचन उपलब्ध होत नाही. केवळ देखाव्यासाठी सिंचन प्रकल्प उभारले की काय अशी वास्तव स्थिती आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या, अशी विनंती करण्यात आली.धरणे आंदोलनात अ‍ॅड. संजय अटकारे, रवी रायपुरे, राजू खुटे, विजेंद्र बक्सेरिया, आकाश बक्सेरिया, आदर्श खुटे, मारोती डोर्लीकर, पोर्णिमा लांडे, श्वेता मारेकर, अंजना क्षीरसागर, कलावती थेरे, शांताबाई पिदूरकर, विद्या कोकाटे, सुलक्षणा डेकाटे, मस्तान शेख, कालीदास देवगडे, बिरबल गुर्जल यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)