शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

संविधानामुळेच लोकशाहीचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:10 IST

भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : बल्लारपूर भूषण पुरस्काराने सात जण सन्मानित

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा जगभर गौरव केला जातो. त्यांच्या संविधानामुळे जगात भारतीय लोकशाहीच्या गौरव केला जातो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केले.येथील भारतीय युथ टाईगर्स संघटनेच्या वतीने स्थानिक जयभीम चौक विद्यानगर वॉर्ड येथे सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्य करणाºयांना बल्लारपूर भूषण पुरस्कार व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा सत्कार समारंभ रविवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ना. अहीर बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते बल्लारपूर भूषण पुरस्काराने आनंद तेलंग, प्रतीक तितरे, डॉ. पी. यू. जरीले, सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास सुंचूवार, नगरसेवक विनोद यादव, कुसूम वानखेडे, आदित्य शिंगाडे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी ना. अहीर म्हणाले, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया कार्यकर्त्यांचे यश राजकीय मंडळी हिरावून घेतात. मात्र त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व अन्य क्षेत्रात प्रचंड संघर्ष केला. त्यामुळेच ते देशाचे भाग्यविधाते ठरले. त्याचे प्रेरणादायी विचार कोणीही दडपू शकत नाही. त्यांच्या विचारावर आधारीत नवीन क्रांती समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात लोकशाही शासन व्यवस्था आहे, असे ते म्हणाले.यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, युथ टाईगर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झामरे, प्रशांत मेश्राम, प्रदीप उमरे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांची उपस्थिती होती. दरम्यान क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे अरुण हजारे, अमरनाथ एक्का, आश्विनी उके, इंद्रजित, निशाद, मनोजडे, स्वाती हजारे, निता वर्मा, सुनील माझी, अंकीता चौधरी, रोहिनी डांगे, पारस कौशीक, रमेश नातरर्गी, पास्टर पोर्तलावार यांना खेलरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत झामरे यांनी केले. संचालन अ‍ॅड. पवन मेश्राम यांनी तर आभार रविकुमार पुप्पलवार यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.