शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संविधानामुळेच लोकशाहीचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:10 IST

भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : बल्लारपूर भूषण पुरस्काराने सात जण सन्मानित

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा जगभर गौरव केला जातो. त्यांच्या संविधानामुळे जगात भारतीय लोकशाहीच्या गौरव केला जातो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केले.येथील भारतीय युथ टाईगर्स संघटनेच्या वतीने स्थानिक जयभीम चौक विद्यानगर वॉर्ड येथे सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्य करणाºयांना बल्लारपूर भूषण पुरस्कार व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा सत्कार समारंभ रविवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ना. अहीर बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते बल्लारपूर भूषण पुरस्काराने आनंद तेलंग, प्रतीक तितरे, डॉ. पी. यू. जरीले, सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास सुंचूवार, नगरसेवक विनोद यादव, कुसूम वानखेडे, आदित्य शिंगाडे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी ना. अहीर म्हणाले, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया कार्यकर्त्यांचे यश राजकीय मंडळी हिरावून घेतात. मात्र त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व अन्य क्षेत्रात प्रचंड संघर्ष केला. त्यामुळेच ते देशाचे भाग्यविधाते ठरले. त्याचे प्रेरणादायी विचार कोणीही दडपू शकत नाही. त्यांच्या विचारावर आधारीत नवीन क्रांती समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात लोकशाही शासन व्यवस्था आहे, असे ते म्हणाले.यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, युथ टाईगर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झामरे, प्रशांत मेश्राम, प्रदीप उमरे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांची उपस्थिती होती. दरम्यान क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे अरुण हजारे, अमरनाथ एक्का, आश्विनी उके, इंद्रजित, निशाद, मनोजडे, स्वाती हजारे, निता वर्मा, सुनील माझी, अंकीता चौधरी, रोहिनी डांगे, पारस कौशीक, रमेश नातरर्गी, पास्टर पोर्तलावार यांना खेलरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत झामरे यांनी केले. संचालन अ‍ॅड. पवन मेश्राम यांनी तर आभार रविकुमार पुप्पलवार यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.