शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मागणी वाढली, रक्तादाते घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:50 IST

मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तसेच या दिवसांमध्ये अपघातासह इतर आजारांमध्येही वाढ होत असून रुग्णांलयात रक्ताची मागणी वाढते. मात्र त्या तुलनेमध्ये रक्तदात्यांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांची धावपळ : रक्तदानासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तसेच या दिवसांमध्ये अपघातासह इतर आजारांमध्येही वाढ होत असून रुग्णांलयात रक्ताची मागणी वाढते. मात्र त्या तुलनेमध्ये रक्तदात्यांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा उन्हाळ्यामध्ये स्वेच्छीक रक्तदान करणाऱ्यांची तसेच शिबिरांची संख्या घटली आहे. त्यामुळे रुग्णांना रक्त देताना वैद्यकीय अधिकाºयांना मोठी अडचण निर्माण होत आहे.औद्योगिक शहर असल्याने अपघाताची संख्या अधिक असते. रक्त हे जीवन आहे. एखाद्या रूग्णाला तातडीने रक्ताची गरज असेल आणि ते मिळाले नाही, तर त्यांच्या जिवाचेही बरेवाईट होऊ शकते. जिल्हा सामान्य रूग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या परराज्यासह इतर जिल्ह्यातूनही रूग्ण येतात. साहजिकच येथे बाराही महिने रक्ताची मोठी गरज भासते. अपघातातील जखमी, सिझेरियन प्रस्तुती इतर शस्त्रक्रियांसाठी रूग्णांना रक्ताची गरज भासते. यासाठी गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते.उन्हाळ्यात दरवर्षी रक्ताची कमतरता असते. यावर्षी रक्तपेढीत सर्वच गटांच्या रक्ताची कमतरता आहे. विशेष म्हणजे, एखादे रक्तदान शिबिर आयोजित केल्यास ही कमतरता भरून निघते. अनेकवेळा रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याने नाईलाजाने रूग्णांना खासगी रक्तपेढ्यामधून रक्त विकत घ्यावे लागते. खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. दरवर्षी एप्रिल ते जुलै महिन्यात रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून रुग्णांना दिलासा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.ऐच्छिक रक्तदान शिबिरे व्हावीमार्च ते जून महिन्यामध्ये वाढते तापमान व शाळा महाविद्यालयामध्ये परीक्षा, उन्हाळी, सुट्या असतात. त्यामुळे स्वेच्छिक रक्तदान शिबिरे कमी होतात. परिणाणी रक्ताची कमतरता भासते. त्या अनुषंगाने रूग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून मोठे सहकार्य केले आहे. यानंतरही या संघटना रक्तदान शिबिरांसाठी सहकार्य करेल, अशी अपेक्षा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्ताची मागणी वाढते त्या तुलनेमध्ये रक्तदात्यांची संख्या कमी होते. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी शासकीय ब्लड बँक सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.- डॉ. अमित प्रेमचंदजिल्हा रक्त संक्रमण अधिकारी, चंद्रपूर