शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रपट्याचे रुपांतर पुलात करण्याची मागणी

By admin | Updated: April 10, 2015 00:59 IST

मूल तालुक्यातील भेजगाव राजकीयदृष्टया संवेदनशिल म्हणून परिचत आहे.

भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव राजकीयदृष्टया संवेदनशिल म्हणून परिचत आहे. आजपर्यंतच्या मूल पंचायत समितीच्या इतिहासात भेजगाव येथील रहिवासी असलेल्या पाच व्यक्तींची मूल पंचायत समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली. ही बाब भेजगावच्या गौरवाची असली तरी विकास मात्र शून्य आहे.या परिसरात भेजगाव केंद्रस्थानी असून परिसरात १५ गावे आहेत. हळदी-भेजगाव या गावांच्या शिवेवरुन उमा नदी वाहते. या नदीवर जवळपास ३० वर्षांपूर्वी रपटा बांधण्यात आला. मात्र काळानुरुप या रस्त्यावरुन रहदारी वाढली. मात्र या नदीवरील रपट्याचे पुलात रुपांतर झाले नाही. हा रस्ता कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत बंद राहतो. पावसाळ्याच्या दिवसात १५-१५ दिवस हा मार्ग पाण्याखाली राहतो. कधी मोठमाठे भगदाड तर कधी मधोमधे पुल दबल्याचा प्रकारही घडला आहे.भेजगाव परिसरातील भेजगाव, दुगाळा माल, चकदुधाळा, भेजाळी, बाबराळा, सिंतळा, रेगडी, येरगाव, पिपरीदीक्षित, चकबेंबाळ, चकघोसरी, थेरगाव आदी गावातील नागरिकांचे या पुलामुळे जनजीवन विस्कळीत होते. विद्यार्थ्यांचे शिक्षण, परिसरात ओलिताची शेती करीत असल्याने व दुग्ध व्यवसाय जोमात असल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठेपासून मुकावे लागत आहे. राष्ट्रीयकृत बँका नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील चिंचाळा येथे असल्याने बॅकींग सेवेपासूनही मुकावे लागत आहे.हा रस्ता जिल्हा परिषदेअंतर्गत आहे. पुलाच्या बांधकामाची अंदाजित रक्कम चारवर्षांपूर्वी कमी होती. ती आता वाढून जवळपास १० करोडच्या जवळपास आहे. त्यामुळे जिल्हा परिषद एवढा मोठा निधी या पुलावर खर्च करण्यासाठी पुढे येत नाही. विशेष म्हणजे मूल तालुका पूर्वी सावली व आताच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येते. आतापर्यंत हे क्षेत्र भाजपाच्याच ताब्यात राहिले. मात्र दुर्दैवाने विकासाचा निधी न मिळाल्याने या परिसराचा विकास झाला नाही. (वार्ताहर)