लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : येथील मुख्य रस्त्यासह शिवाजी चौकातील मुख्य रस्ता हा महामार्ग आहे. चंद्रपूर नागपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा मार्गाला जोडणारा रस्ता असून, या मार्गावर भरधाव वाहने सतत धवतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी सीसीटीव्ही कॅमेराची कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे.सिंदेवाहीवरुन जोडणारा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, वर्धा, हिंगणघाट, या मार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे हजारो वाहने रोज अवागमन करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. अपघात घडविणारे वाहन सुसाट वेगाने पळाल्यास त्याचा थांगपत्ता लागत नाही. असे प्रकार अनेकवेळा घडले. आहे. त्यामुळे एखाद्याचा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे काही वेळा वाहनधारक दारूसोबत आणत असून पोलिसांच्या धाकामुळे ते सुसाट वाहने चालवितात. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या वाहनांवर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे. अल्पवयीन चालक, ट्रिपल सीट चालक व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले असल्याने नवरगावसह सिंदेवाहीतील मुख्य रस्त्याच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी केली जात आहे.जिल्ह्यातील काही शहरातील रस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. मात्र सिंदेवाही, नवरगाव परिसर आजही मागे आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सीसीटीव्ही लावून अवैध धंद्यांना नियंत्रित करण्याची मागणी होत आहे.
मुख्य मार्गावर सीसीटीव्ही लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST
सिंदेवाहीवरुन जोडणारा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, वर्धा, हिंगणघाट, या मार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे हजारो वाहने रोज अवागमन करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. अपघात घडविणारे वाहन सुसाट वेगाने पळाल्यास त्याचा थांगपत्ता लागत नाही. असे प्रकार अनेकवेळा घडले. आहे. त्यामुळे एखाद्याचा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्य मार्गावर सीसीटीव्ही लावण्याची मागणी
ठळक मुद्देसिंदेवाही, नवरगाव मार्गावर अवैध वाहतूक