शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:44 IST

राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे मागील दोन वर्षापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होता. परिणामी नागरिक त्रस्त झाले

मुख्य अभियंत्याला निवेदन : विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्तविरूर (स्टे) : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे मागील दोन वर्षापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होता. परिणामी नागरिक त्रस्त झाले त्यामुळे विरूर येथे स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याच्या मागणीचे निवेदन चंद्रपूर येथील मुख्य अभियंता यांना बुधवारला देण्यात आले आहे.राजुरा तालुक्यामध्ये विरूर परिसर हा आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जातो. तालुक्यातील विरूर स्टेशन हे गाव मोठे असून येथील लोकसंख्या दहा हजाराच्यावर आहे. याठिकाणी पोलीस ठाणे, वन विभाग कार्यालय, शाळा-महाविद्यालये तसेच अनेक शासकीय कार्यालये आहेत. तसेच येथे आठवडी बाजार भरत असून परिसरातील मुख्य बाजारपेठ आहे. १५ वर्षापूर्वी विरूर येथे २२० केव्ही व ३३ केव्ही विद्युत केंद्र उभारण्यात आले. त्यामुळे विरूर व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आतातरी वीज पुरवठा सुरळीत राहिल. अशी अपेक्षा नागरिकांना होती.मात्र ही आशा फोल ठरली. वीजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे. सततचा विजेच्या कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत आहे.त्यामुळे नागरिकांचे नुकसानही होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत.मागील कित्येक महिण्यांपासून वीज पाच मिनीटे राहते, तर अर्ध्या तासातच गायब होते. दिवसांतून किती वेळा वीज जाते. आणि येते यांचा अंदाजसुद्धा बांधता येत नाही. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायीकांचे धंदे डबघाईस आले आहेत. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. तसेच विजेवर चालणारे उद्योग धंदे चौपट झाले आहे. त्याचबरोबर आटाचक्की, कांडप केंद्र, एसटीडी केंद्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु विकणारे व दुरुस्त करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. बँकेचे व्यवहार, दुकाने, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच कार्यालयीन कामे हे आॅनलाईन झाले असल्याने विजेचा लपंडावाने जनजीवन प्रभावीत झाले आहे. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन विरूर येथे स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात विरूर येथील सरपंच भास्कर सिडाम, जि.प. सदस्य अविनाश जाधव, अजय रेड्डी, मनोज सारडा, विलास आक्केवार, किट्टी बवेजा, व्यापारी अध्यक्ष संतोष ढवस, बबलू सोनी, शामराव कस्तुरवार आदी नागरिक होते. (वार्ताहर)