शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:44 IST

राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे मागील दोन वर्षापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होता. परिणामी नागरिक त्रस्त झाले

मुख्य अभियंत्याला निवेदन : विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्तविरूर (स्टे) : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे मागील दोन वर्षापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होता. परिणामी नागरिक त्रस्त झाले त्यामुळे विरूर येथे स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याच्या मागणीचे निवेदन चंद्रपूर येथील मुख्य अभियंता यांना बुधवारला देण्यात आले आहे.राजुरा तालुक्यामध्ये विरूर परिसर हा आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जातो. तालुक्यातील विरूर स्टेशन हे गाव मोठे असून येथील लोकसंख्या दहा हजाराच्यावर आहे. याठिकाणी पोलीस ठाणे, वन विभाग कार्यालय, शाळा-महाविद्यालये तसेच अनेक शासकीय कार्यालये आहेत. तसेच येथे आठवडी बाजार भरत असून परिसरातील मुख्य बाजारपेठ आहे. १५ वर्षापूर्वी विरूर येथे २२० केव्ही व ३३ केव्ही विद्युत केंद्र उभारण्यात आले. त्यामुळे विरूर व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आतातरी वीज पुरवठा सुरळीत राहिल. अशी अपेक्षा नागरिकांना होती.मात्र ही आशा फोल ठरली. वीजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे. सततचा विजेच्या कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत आहे.त्यामुळे नागरिकांचे नुकसानही होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत.मागील कित्येक महिण्यांपासून वीज पाच मिनीटे राहते, तर अर्ध्या तासातच गायब होते. दिवसांतून किती वेळा वीज जाते. आणि येते यांचा अंदाजसुद्धा बांधता येत नाही. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायीकांचे धंदे डबघाईस आले आहेत. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. तसेच विजेवर चालणारे उद्योग धंदे चौपट झाले आहे. त्याचबरोबर आटाचक्की, कांडप केंद्र, एसटीडी केंद्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु विकणारे व दुरुस्त करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. बँकेचे व्यवहार, दुकाने, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच कार्यालयीन कामे हे आॅनलाईन झाले असल्याने विजेचा लपंडावाने जनजीवन प्रभावीत झाले आहे. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन विरूर येथे स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात विरूर येथील सरपंच भास्कर सिडाम, जि.प. सदस्य अविनाश जाधव, अजय रेड्डी, मनोज सारडा, विलास आक्केवार, किट्टी बवेजा, व्यापारी अध्यक्ष संतोष ढवस, बबलू सोनी, शामराव कस्तुरवार आदी नागरिक होते. (वार्ताहर)