शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पकडीगुड्डम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना देण्याची मागणी

By admin | Updated: November 29, 2014 23:19 IST

कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले तथा शेतकऱ्यांनी एका लेखी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.पकडीगुड्डम-मरकागोंदी धरणाखाली लाभक्षेत्रात १२ गावे असून सिंचनाखाली २६८० हेक्टर क्षेत्र आहे. परंतु सदर धरणातील एकूण पाण्यापैकी ३/४ पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतपिकांसाठी सिंचनासाठी पाणी मिळत नाही. मिळाले तरी अपुरे मिळते. त्यामुळे उत्पन्न मिळत नाही.या धरणाचे पाणी शेतपिकांना मिळण्यासाठी तीन ते चार वेळा चक्का जाम आंदोलन केले. शेतकऱ्यांवर अजुनही कोर्टात कारवाई सुरू आहे. अंबुजा सिमेंट कंपनीला पकडीगुड्डम धरणाचे पाणी देण्याबाबतचा १२ वर्षांचा करार शासनाने केला होता. मात्र तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आठ वर्षाचा करार केला होता व कंपनीने पैनगंगा नदीवरुन पाणी घेण्याचे निर्देश दिले होते. करार संपून सुद्धा धरणाचे पाणी कंपनीला देणे सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळणे अशक्य झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.शासनाने याबाबत दखल घेऊन पकडीगुड्डम धरणाचे पाणी सिमेंट कंपनीला पुरविणे तात्काळ थांबवावे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ पाणी द्यावे अशी मागणी पुरुषोत्तम आस्वले तथा १२ गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.लोकप्रतिनिधींनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रति ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, आ. संजय धोटे, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसिलदार कोरपना, ठाणेदार कोरपना यांच्याकडे पाठविल्या आहेत. (वार्ताहर)