शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

पकडीगुड्डम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना देण्याची मागणी

By admin | Updated: November 29, 2014 23:19 IST

कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले तथा शेतकऱ्यांनी एका लेखी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.पकडीगुड्डम-मरकागोंदी धरणाखाली लाभक्षेत्रात १२ गावे असून सिंचनाखाली २६८० हेक्टर क्षेत्र आहे. परंतु सदर धरणातील एकूण पाण्यापैकी ३/४ पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतपिकांसाठी सिंचनासाठी पाणी मिळत नाही. मिळाले तरी अपुरे मिळते. त्यामुळे उत्पन्न मिळत नाही.या धरणाचे पाणी शेतपिकांना मिळण्यासाठी तीन ते चार वेळा चक्का जाम आंदोलन केले. शेतकऱ्यांवर अजुनही कोर्टात कारवाई सुरू आहे. अंबुजा सिमेंट कंपनीला पकडीगुड्डम धरणाचे पाणी देण्याबाबतचा १२ वर्षांचा करार शासनाने केला होता. मात्र तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आठ वर्षाचा करार केला होता व कंपनीने पैनगंगा नदीवरुन पाणी घेण्याचे निर्देश दिले होते. करार संपून सुद्धा धरणाचे पाणी कंपनीला देणे सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळणे अशक्य झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.शासनाने याबाबत दखल घेऊन पकडीगुड्डम धरणाचे पाणी सिमेंट कंपनीला पुरविणे तात्काळ थांबवावे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ पाणी द्यावे अशी मागणी पुरुषोत्तम आस्वले तथा १२ गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.लोकप्रतिनिधींनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रति ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, आ. संजय धोटे, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसिलदार कोरपना, ठाणेदार कोरपना यांच्याकडे पाठविल्या आहेत. (वार्ताहर)