शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

नुकसान भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: July 16, 2016 01:21 IST

तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली.

तहसीलदारांना निवेदन : मानोरा परिसरात भाताचे नुकसान बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली. मात्र संततधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी बुधवारी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बल्लारपूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११३२.२१ मिमी इतके आहे. जून-जुलै महिन्यात आजतागायत ९२० मिमी इतके पर्जन्यमान झाले आहे. पाच दिवसांच्या संततधार पावसाने मानोरा परिसरातील भाताचे पऱ्हे नेस्तनाबूत झाले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. भाताची रोवणी करण्यासाठी दुबार पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. बी-बियाणे, खते, मजुरी व शेतीच्या मशागतीचा खर्च दुसऱ्यांदा करावा लागणार आहे. यामुळे मानोरा परिसरातील धान उत्पादक शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहे. मानोरा भागात मुख्य व्यवसाय शेतीचा असून गावाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने हातात येणारे पीक नष्ट झाले. परिणामी शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. दुबार पेरणी करण्यासाठी बी-बियाणे व आर्थिक मदत पीडित शेतकऱ्यांना देण्याची मागणी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी केली आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व बल्लारपूर पंचायत उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांनी केले. यावेळी माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, मानोरा येथील सरपंच सविता धोडरे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, कोर्टीमक्ताचे उपसरपंच गोविंदा उपरे, धोडरे व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)