शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: July 16, 2016 01:21 IST

तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली.

तहसीलदारांना निवेदन : मानोरा परिसरात भाताचे नुकसान बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली. मात्र संततधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी बुधवारी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बल्लारपूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११३२.२१ मिमी इतके आहे. जून-जुलै महिन्यात आजतागायत ९२० मिमी इतके पर्जन्यमान झाले आहे. पाच दिवसांच्या संततधार पावसाने मानोरा परिसरातील भाताचे पऱ्हे नेस्तनाबूत झाले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. भाताची रोवणी करण्यासाठी दुबार पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. बी-बियाणे, खते, मजुरी व शेतीच्या मशागतीचा खर्च दुसऱ्यांदा करावा लागणार आहे. यामुळे मानोरा परिसरातील धान उत्पादक शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहे. मानोरा भागात मुख्य व्यवसाय शेतीचा असून गावाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने हातात येणारे पीक नष्ट झाले. परिणामी शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. दुबार पेरणी करण्यासाठी बी-बियाणे व आर्थिक मदत पीडित शेतकऱ्यांना देण्याची मागणी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी केली आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व बल्लारपूर पंचायत उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांनी केले. यावेळी माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, मानोरा येथील सरपंच सविता धोडरे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, कोर्टीमक्ताचे उपसरपंच गोविंदा उपरे, धोडरे व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)