शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

राष्ट्रीय महामार्ग निर्मितीला विलंब

By admin | Updated: June 28, 2015 01:56 IST

नागपूर- ब्रह्मपुरी- आरमोरी या राज्य मार्गाने आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर झाले आहे.

बायपाससाठी राजकीय दबाव : शेतकऱ्यांची नुकसान होण्याची शक्यताब्रह्मपुरी : नागपूर- ब्रह्मपुरी- आरमोरी या राज्य मार्गाने आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर झाले आहे. रस्त्याच्या डागडूजी बद्दल सांगितले असता संबंधित विभागाचे उत्तर असते की, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला असल्याने आम्ही काम करु शकत नाही तेव्हा एक तर राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असेल तर कामाला विलंब होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी केली जात आहे.नागपूर- उमरेड- भिवापूर- नागभीड- ब्रह्मपुरी- आरमोरी या मार्गाचे राज्यमार्ग रुपांतरित राष्ट्रीय महामार्ग ३५/३/डी होणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीत अनेक व्यावसायिकांच्या इमारती व काही प्रमाणात शेतजमिनी जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच काही राजकीय पुढाऱ्यांनी दबाव टाकून त्याऐवजी बायपास रोड बनविण्याविषयी योजना आखली जात असल्याने महामार्गाच्या कामाला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. बायपास रोड काढताना अनेक शेतकऱ्यांच्या उपजिवेकेचे साधन असलेल्या शेतजमिनी जाणार असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचेही बोलले जात असल्याने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात यावी असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे. या राष्ट्रीत महामार्गाच्या कामासाठी रुंदीकरण सर्वेक्षण व अंदाजपत्रकात पुल, वळण, बायपास संबंधी पूर्ण माहिती सादर केली असून उमरेड, भिवापूर, नागभीड, ब्रह्मपुरी, आरमोरी मार्ग आता चार पदरी होणार आहे. गावाबाहेर राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण मध्यापासून २२ मिटर राहणार आहे. परंतु गावात याच नियमाने घेतल्यास अनेक व्यवसायीक कॉम्प्लेक्स, इमारती अतिक्रमणात येत असल्याने त्या हटविण्यात येणार असल्याने काही व्यावसायिकांना भिती निर्माण झाली आहे.परंतु राजकीय दवाब टाकून गावाच्या बाहेरुन बायपास काढण्याच्या हालचाली सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धनशक्तीचाही वापर होत असल्याचे बोलले जात आहे. आपल्या पक्या इमारती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींमधून बायपास काढण्याचा मनसूबा रचल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची वेळ येणार असल्याने शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. रस्ता शहरातूनच व्हावा, अशी सामान्य जनतेची भावना आहे. (तालुका प्रतिनिधी)