शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही रूजू होण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उभारण्याची घोषणा फडणवीस यांनी केलीे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गतवर्षीच सुरू झाले.

ठळक मुद्देकार्यालय निर्मितीवरच प्रश्नचिन्ह : उच्चस्तरीय समितीने दिली होती मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीची घोषणा केली होती. उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने येथील अप्पर जिल्हाधिकारीसह सहा पदांना मान्यता दिली. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शशिकांत सुके यांची नियुक्तीही झाली. मात्र दोन महिने होवूनही रूजू झाले नाही.त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उभारण्याची घोषणा फडणवीस यांनी केलीे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गतवर्षीच सुरू झाले.अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत उच्चस्तरीय समितीने ८ जुलै २०१९ रोजी मंजुरी दिल्यानंतर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अप्पर जिल्हाधिकारी पदासह नायब तहसीलदार १, लघुलेखक १, अव्वल कारकून १, लिपिक टंकलेखक २ तसेच चालक, शिपाई अशी सहा पदे शिपाई बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.नागरिकांची कामे रखडलीचिमुरचे पहिले अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शशिकांत सुके यांची राज्य शासनाने ३० एप्रिल २०२० रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दोन महिने होवूनही रूजू झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांची विविध कामे रखडली आहेत. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी आयुक्त (महसूल) नागपूर यांना पत्र लिहून चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना रूजू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी